Friday, March 5, 2021

लीडर जन्माला येत नाहीत,ते घडवावे लागतात.

लीडर जन्माला येत नाहीत,ते घडवावे लागतात.

कोकणात तीन दिवसांचा माझा हा तिसरा दौरा झाला, तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ सांगून कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतंत्र मजदूर युनियनशी विचारांने जोडणे हाच प्रमुख उद्देश होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सफाई कामगारांची पहिली युनियन स्थापन केली ती १९३४ ला त्यावेळी बहुसंख्येने सफाई कामगार हे कोकणातील होते आणि आजही महानगरपालिका मध्ये घन कचरा व्यवस्थापन सह इतर विभागात कोकणातील कामगार माणूस लक्षवेधी संख्येने आहेत. गावकी भावकीत तो जो शिस्तबद्ध असतो, तसाच तो आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीत नेतृत्व करण्यासाठी लक्षवेधी असला पाहिजे होता.कारण त्यांचे वडील आजोबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते, तोच त्यांना प्रेरणादायी आदर्श असला पाहिजे होता. कोकणातील माणूस कधी कधी गर्वाने सांगतो बाबासाहेब आंबेडकर कोकणातील होते. आंबावडे,त्यांचे मुळगांव, रमाईचे जन्म गांव वनंद,मंडणगड, दापोली रत्नागिरी जिल्हा हे सर्व चळवळीचे प्रमुख प्रेरणादायी केंद्र आहेत.त्याच पद्धतीने कोकणातील महाड चवदार तळे आंदोलन दोन कारणाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले आहे. एक चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह तर दुसरे मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन. त्यामुळेच कोकण विभाग हा आंबेडकरी चळवळीचा प्रथम संघटन, सत्याग्रह,आंदोलन, संघटन कौशल्य,वक्तृत्व नेतृत्व घडविणारे केंद्र समजले पाहिजे.परंतु असे काही मला दिसले नाही. 

कोकणात महानगरपालिका,नगर परिषद,नगरपालिका,नगर पंचायत आहेत त्यात काम करणारा कामगार शंभर टक्के मागासवर्गीय विशेष एस सी,एसटी आहे.पण संघटना युनियन भाजपा शिवसेना पक्षांच्या विचारांच्या आहेत. अनेक वरिष्ठांना जेष्टना आवर्जून भेटी घेतल्या याबाबत माहिती घेतली असता. त्यांचे म्हणणे समाजाला नेतृत्व चांगले मिळाले नाही. गावकी भावकीच्या पलीकडे कोणत्याही संघटना नाही. त्यातील संघर्ष मूळ समस्या पेक्षा भयंकर आहे. इतिहास वाचला तर इतिहास घडविला येतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याचे सांगितल्या जाते.
स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे काय ?. अजून समजलेच नाही. मी १९८२ पासून असंघटित नाका कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी किर्याशील कार्यकर्ता म्हणून काम करतो.विजय सातपुते यांच्यामुळेच विचार करण्याची पद्धत बदलली.वाचन अभ्यास असल्या शिवाय परीक्षा देता येत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याग,कष्ट आणि जिद्द लागते. आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.दगडाला खूप घाव सोसावे लागतात तेव्हाच त्याच दगडाची मूर्ती आकार घेते त्याला देव समजल्या जाते.
लीडर बनण्यासाठी संघटन,वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल आत्मसात करून घ्यावे लागते,एका दिवसात,महिन्यात, वर्षात ते आत्मसात होत नाही. लीडर मध्ये काही गुण असणे आवश्यक असतात. ते कार्यातून कृतीतून दिसतात.त्यांची चर्चा होत असते. त्यामुळेच तो लीडर म्हणून ओळख निर्माण करतो.काय पाहिजे लीडर बनण्यासाठी?.वाचा आणि विचार करा.
१) दूरदृष्टी (vision) लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते.२) ध्येयनिश्चिती (Goals) लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत.३) आत्मविश्वास (Self Confidence) ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. ४) अनुशासन (Discipline) एक चांगला लीडर एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. ५) चिकाटी (Persistance) कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते.
६) नियोजन (Planning) नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. ७) योग्य निर्णय (ProperJudgement) लीडरला सर्वांची बाजू ऐकून,सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे.८) धैर्य (Patience) नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी 
अंमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते.९) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilities) नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. १०) बदलाचा स्वीकार (Accept  changes) बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना,आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे. ११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा (Be A Coach & Guide) प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे.प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे. १२) आकर्षक व्यक्तिमत्व (Pleasing Personality)
एक लीडर म्हणून तुमच्यावर,तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद व संपर्क पाहिजे.१३) प्रशासनिक कौशल्य (administrative skills) एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. १४) संभाषण कौशल्य (Communication skills) एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता.१५) निर्णय घेण्याची कला (Decision making ability) एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे.१६) जोखीम घेण्याची क्षमता  (Risk Taking Ability) नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे. १७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक  (Creativity and Innovation) हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. १८) समस्या सोडविण्याचे कौशल्य  (problem solving skills) खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच.१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता  (Flexibility And Adaptability) लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे.२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य (Time Management Skills) लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे.२१) लोकांना प्रोत्साहित करा ( Motivate People)
लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.  (Lead By Example) कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.२३) टीम प्लेयर्स व्हा ( Be Team Players) लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.
संघटनेचे महत्व आपण हातांच्या बोटासारखे राहिले पाहिजे. कोणतेही बोट दुसऱ्या बोटासारखे नसते ' पण तरीही एखादी वस्तु उचलताना ती बोटे एकत्र येतात. पांच बोटे चौदा कांडे एकत्र आले तर ती हजारो कामे करतात. कारण एकत्र आल्यावर ती फक्त बोटे कांडे राहत नाहीत तर एक संघटीत मुठ बनते. ही मुठचं एक शक्ती होऊ शकते. अन् वेळप्रसंगी ठोसा देऊन आलेल्या प्रसंगावर मात करू शकते. बोटे म्हणजे माणसे अन् मुठ म्हणजे संघटना.त्याचे जो नेतृत्व करतो तो असतो लीडर. म्हणजे जी शक्ती एका माणसात नाही ती संघटनेत आहे.ती कुठे,कधी कशी वापरावी याचे ज्याला ज्ञान असते तोच खरा लीडर असतो. म्हणुनच एकतेचे, संघटनेचे, महत्व लक्षात घेऊन सर्वांनी संघटीत राहीले पाहिजे.आणि लीडरशिप तयार केली पाहिजे. कोणती संस्था, संघटना वन मॅन शो नसावी म्हणून दोन,तीन किंवा पांच वर्षांनी निवडणूका होत असतात. तो नियम सर्वांना सारखा असतो. म्हणूनच आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.हा प्रत्येक संस्था, संघटना, युनियन,पक्षांना नियम लागू असतो.जे यानियमांचे पालनकरतो तोच यशस्वी होत असते. म्हणूनच स्वतंत्र मजदूर युनियन ही क्रांतिकारी विचारांची आंबेडकरी कामगार चळवळ राष्ट्रीय पातळीवर उभी राहतांना दिसत आहे.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,
अध्यक्ष:-स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.

 मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.

महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत मराठी माणसाचे व मराठीचे भाषेचे ह्रदय सम्राट यांनी त्यांच्या मनसे सैनिकाकडून मराठी भाषा दिन खूप उत्स्फूर्तपणे रोडवर स्टेज बांधून साजरा केला गेला . काहींना त्यांचे खूप कौतुक वाटले तर माझा सारख्यांना खूप दुःख वाटले.या भामट्यांना मराठी भाषा दिनाचे एवढयात मनापासून आदर असता तर यांनी मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडू दिला असत्या काय?. कारण या महानगरपालिकेच्या मराठी शाळेत बहुसंख्येने मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी माणसांची मूलमुलीच शिकत होती नां!.परंतु ती संपूर्ण मराठा,मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी होते म्हणून यांनी महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. बाकीच्या वेळी कानाखाली खाल्ल्याळ खटाक आवाज काढणारे मानसिक वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मराठी शाळा बंद केल्या तेव्हा कोणत्या बिळात बंद होते. हे जाहीरपणे विचारण्याची हिंमत मुंबईत मराठी माणसात, पत्रकार,संपादक राहिली आहे काय?.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात येत आहेत. आणि गांवागांवात इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमेरी के जी,सिनियर के जी शाळा भांडवलदारी उद्योग सुरू करण्यात आले आहेत.ते माय मराठी भाषा व माणसाला मारून इंग्रजी भाषेच्या मॉमचे गोड कौतुक करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील मातृभाषा मराठी गुन्हेगार ठरविली जात आहे. यांची जाणीव मराठी भाषा व मराठी माणसाच्या ह्रदय सम्राटांना त्यांचे मनसे सैनिकांना नाही काय?.की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
साडेतीन टक्के लोक जी तथाकथित प्रमाण मराठी भाषा बोलतात त्या भाषेने अस्सल मराठी बोली भाषेला जवळजवळ संपवलेच आहे. पाठ्यपुस्तकांतील प्रमाण भाषेमुळे वर्‍हाडी, झाडी, अहीराणी, माणदेशी, नागपूरी, कोष्टी, वंजारी भाषेसह तर अनेक बोलीभाषा आता केवळ घराच्या भिंतीआड बोलल्या जाणाऱ्या भाषा तेवढ्या शिल्लक आहेत. त्याचं बोली भाषेत सर्वांसमोर बोलले तर यांचं मराठी भाषा दिनाचे गोडवे गाणाऱ्यांच्या तोडून त्याला गावठी म्हटल्या जाते.तरीही आम्हाला ब्राह्मणी प्रमाण मराठी भाषेचा अभिमान बाळगायला सांगितले जाते.असे सांगणाऱ्या सर्व राजकारण्यांची,सनातन्यांची मुले मात्र विदेशात शिकत आहेत.
    महाराष्ट्रात मुंबई,पुणे, नाशिक, मनमाड,औरंगाबाद नागपूर जिथे जिथे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जेव्हा जेव्हा शाळा, कॉलेजच्या विरोधात आंदोलने झाली तेव्हा तेव्हा तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे आली.मराठी भाषा असणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रांच्या शैक्षणिक सवलती बंद करण्यात आल्यावर तेव्हा मराठी भाषा दिनाचे गर्व सांगणारे मराठी ह्रदय सम्राट त्यांच्या संघटना आणि यांचे वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा असणाऱ्या मराठा,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सोबत उभे राहिले नाही.मुंबई, पुणे,औरंगाबाद, नागपूर नाशिक येथे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वागणूक दिली जाते. यांचा कधी कोणी विचार केला आहे काय?.मराठी भाषा बोलण्यात आणि लिहण्यात फरक असला की ग्रामीण भागातील विद्यार्थी नापास होतो.कारण पेपर तपासणारे शुद्ध मराठी बोलणारे असतात.

 मराठी भाषा गौरव दिन व राज्यभाषा मराठी दिन 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४'नुसार महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी १९१२ जन्म झाला होता.यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस  "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी रोजी घेण्यात आला.
मराठी राजभाषा दिन,मराठी दिन हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि मराठी माणसावर प्रेम व्यक्त करण्याची यांची पद्धत समजून घेतले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा हे कुसुमाग्रजांच्या जन्म पासून झाली. ते सर्व देश मान्य करतो मग महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती यांची जन्म तारीख तीस बत्तीस वर्षांनी इतिहास संशोधक विचारवंत्यांच्या समितीनी १९ फेब्रुवारी हीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता तो अजूनही मराठी भाषा आणि माणसांचे हृदय सम्राट आणि त्यांचे वैचारिक गुलाम सैनिक शासन निर्णय मान्य का करीत नाही.

 छत्रपती शिवाजी महाराज मराठी नव्हते काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.त्यांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, जेधे,जवळकर हे मराठी माणसं नव्हते त्यांची भाषा मराठी नव्हती?. राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ पंजाबराव देशमुख हे मराठी माणसं नव्हती काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे खूप गौरवाने सांगितले जाते. त्यांनी आपल्या मातृभाषेला गौरव प्राप्त करून दिला असे म्हटले जाते.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात मराठी मातृभाषा वापरल्या जात होती असे इतिहास सांगतो.आणि सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आज ते सत्य मराठी भाषा वापरात होती हे मान्य करतात.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियात छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा व गिरणी कामगारांच्या जीवनावरील "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते कायली" लावणी किंवा फकडं कोणत्या भाषेत गायिली होती.शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर,शाहीर साबळे संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह आंदोलने यात जनजागृती करणारी भाषा मराठीच होती. व प्रबोधनकार ठाकरे यांची भाषा मराठीच होती म्हणजे मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.खरा इतिहास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.महाराष्ट्र राज्य व मराठी,मराठी भाषा आणि मराठी माणूस जातीमुळे गौरविण्यात येतो. आता तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाने जागे झाले पाहिजे,मराठी भाषा मराठी शाळा वाचल्या तर मराठी माणूस वाचेल अन्यता महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस उपरा ठरणार आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.परप्रांतीय बिल्डर, ठेकेदार भांडवलदार यांना मदत करून आपल्याच घरादारावर जेसीबी चा नांगर फिरवतील.मराठी माणसा जागा हो छत्रपतीचा मावळा हो!.जात,धर्म,पंथ विसरून स्वराज्य निर्माण करण्याचा धागा हो.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई, 

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन.