Friday, August 28, 2020

सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित

 सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित

देशात सर्व राज्यात कोरोनाच्या भितीमुळे असंघटीत कष्टकरी कामगार शहरे सोडून गांवाकडे पायी चालत निघाला असतांना त्याला कोणीच हिंदू लोक, हिंदू कामगार, हिंदू मजदूर म्हणत नाही.कारण हे सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक भटक्या जाती जमातीचे आहेत. मुंबई महानगरी हे देशाची आर्थिक राजधानी येथे कोरोनाचा प्रचंड फैलाव होत असतांना सफाई कामगार मुंबईतील कचऱ्याचा नरक उपसत आहेत.घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारा कंत्राटी कामगार म्हणजे कार्यालयीन भाषेत "स्वछता दूत" यांची कोणी सन्मानाने नांव घेत नाही. हाच सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज साडे सहा हजार मेट्रिक टन कचरा उपसून त्याची विल्हेवाट लावत असतो. यात प्रतिबंधित भागातील कचऱ्याचाही समावेश आहे. कधीही आपण कोरोनाच्या संपर्कात येऊ अशी भीती सफाई कामगारांना वाटत आहे. तरीही अशा भयावह स्थितीत असंघटीत कंत्राटी कामगार संघटीत कामगारांच्या सोबत आपले कर्तव्य बजावत आहेत.      
डॉक्टर,परिचारिका,पोलीस यांच्या कामाला तर तोडच नाही. त्यांच्या प्रमाणे सफाई कामगारही महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र सफाई कामगारांच्या कामाला प्रतिष्ठा नाही. कोरोनाच्या या भीतीदायक काळात जीव धोक्यात घालून काम करणारा हा कामगार अजूनही दखलपात्र नाही. या दिवसात त्याने तब्येतीचे कारण सांगुन दांडी मारली तर नोकरी गेली अशी भीती त्यांच्या मनात करून ठेवली आहे. त्यांची सन्मानजनक नोंद न घेणाऱ्या कामगारांवर केवळ फुले उधळली जात असली, तरी तो सध्या ज्या स्थितीत काम करीत आहे. त्या परिस्थितीत तो जगला पाहिजे. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
पालिका प्रशासनाच्या लेखी घाणीत काम करणारा हा सफाई कामगार कचराच ठरला आहे. मात्र कोरोनाच्या काळात सफाई कामगार सुरक्षित असला तर मुंबई सुरक्षित राहील. याचे भान प्रशासनाला असल्याचे दिसत नाही. सफाई कामगारांच्या मुळे स्वच्छ मुंबई,सुंदर मुंबई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत रोज जमा होणा-या कच-याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले. हॉटेल्स, मॅाल्स, लॉज, मंगल कार्यालये, कॅटरर्स आदी व्यवसाय बंद असल्याने कचरा जमा होण्याचे रोजचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले असे म्हटले जाते. रोज साडेसात हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा जमा होत होता, आता साडेचार हजार मेट्रिक टनावर आला असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व कामधंदे बंद असल्यामुळे बहुतेक माणस घरात असल्यामुळे घरातील जेवण बनविण्यासाठी लागणारा भाजीपाला, कांदा बटाटा इतर कच्चे साहित्य यामुळे होणारा कचरा?. यांची नोंद अधिकारी हिशेबात घेत नाही. कचरा विभागातील सफाई कामगारांच्या प्रत्येक चौकीत साठ कामगार काम करीत आहेत. मुंबईत अशा सुमारे 380 चौक्या आहेत. या चौक्यामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. बहुतांश चौक्यांमध्ये पाणी नाही. वीज नाही. कोरबा मिठागर मधील चौकीत बावीस वर्ष वीज नव्हती आता कुठे वीज सुरू झालीय. घाणीतून काम करून आल्यानंतर आंघोळीसाठी पाणी नाही. कामगारांना आराम करण्यासाठी जागा नाही. चौकीच्या दारात उभे राहून हजेरी लावायची आणि झाडू घेऊन नेमून दिलेले कामच्या ठिकाणी काम करायचे. काही चौक्या कंटेनारच्या आहेत. त्यात काहीच सुविधा नाहीत. शौचयालयाची व्यवस्थाही त्यात नाही. महिला कामगारांची तर अवस्था खूप वाईट आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही. अस्वच्छतेने त्यांना कोणतेही आजार होऊ शकतात. कोरोनामुळे सफाई कामगार हादरून गेले आहेत. त्यामुळे सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित असणार आहेत.
वसाहतींची दुरावस्था पंचशीलनगर कुलाबा, फलटणरोड क्रॉफर्ड मार्केट, कोचीन स्ट्रीट बीपीटी (आता धारावीत स्थलांतर), गौतमनगर, कासारवाडी दादर, शुक्लाजी स्ट्रीट कामाठीपुरा, वालपाखाडी डोंगरी, टॅंक पाखाडी भायखळा, बकरी अड्डा चिंचपोकळी, ऑर्थर रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सोळंकी मार्ग मिनर्वा, प्रभादेवी, घाटला व्हिलेज, चेंबूर स्थानक, घाटकोपर, मालाड, मुलुंड या ठिकाणी सफाई कामगारांच्या वसाहती आहेत. कामगार कामावरून आल्यानंतर या वसाहतींच्या ठिकाणी आंघोळ करण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. या वसाहतीत पुरेसे पाणी नाही, स्वच्छता नाही. त्यामुळे या वसाहती रोगाचे आगारच झाल्या आहेत. त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष नाही. मान्यताप्राप्त युनियन पदधिकारी कामगारांच्या जीवनावश्यक गरजा कडे लक्ष देत नाही. सोयीस्कारपणे जातीव्यवस्था, वर्णव्यवस्थेचे समर्थन केले जाते.असे लक्षात येऊन ही कामगार युनियनला आपली कामगार शक्ती दाखवीत नाही.याचे वाईट वाटते. मुंबईत घराची समस्या असल्याने सफाई कामगारांच्या दहा बाय दहाच्या घरात 10 ते 12 व्यक्ती राहातात. येथे कोणतेही सोशल डिस्टनसिंग नाही. सोशल डिस्टनसिंग पाळता येत नाही. एका जरी कामगाराला कोरोनाची बाधा झाली तरी त्याचा फैलाव त्यांच्या कुटुंबासह वसाहतीत झपाट्याने होऊ शकतो. सफाई कामगार कामावर गेला नाही तर मुंबईचा कचरा कोण उचलणार ?. म्हणूनच सुरक्षित तर मुंबई सुरक्षित असेल.
हँडलोज मास्क नाही. कामगारांना रस्ते अंतर्गत सोसायटयांच्या गल्ल्या, दाट वस्त्याच्या गल्ल्या झाडताना खिडक्यातून लोक कचरा फेकतात. कधीकधी सफाई कामगारांच्या अंगावरही कचरा पडतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे गुन्हा असला तरी त्याचे पालन होत नाही. हॅन्डग्लोज, मास्क, झाडू, साबण आदी साहित्य कामगारांना दिले जात नाही. काही कामगार नाकाला रुमाल बांधून कामगार काम करताना दिसत आहेत. त्यांना कोरोनाच्या संपर्कात येण्याची भीती आता सर्वच सफाई कामगारांना सतावत आहे. त्यामुळे एकच चर्चा होते.सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित म्हटले जाते.
चौक्या,गाड्या आणि वसाहतींचे निर्जंतुकीकरण झाले नाही.कामगारांच्या चौक्या, वसाहती आणि गाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची मागणी सफाई  कामगार करीत आहेत. कचरा उचळणाऱ्या गाड्यांवर काम करणारे कामगारही कोरोना वाढू लागल्याने भयभीत झाले आहेत. स्वच्छतेच्या योजना प्रभावहीन स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, क्लीन अप मार्शल या योजना पालिकेने राबविल्या मात्र त्या योजना प्रभावहीन ठरल्याचा आरोप स्थायी समिती आणि पालिका सभागृहात झाला होता. पण उपाय योजना योग्य त्या प्रमाणात झाली नाही. निर्जंतुकीकरण करण्यासाठी sanitizer सानीटीझेर किती प्रमाणत वापरले पाहिजे यांचे नियम आहेत.योग्य प्रमाणात सानीटीझेर टाकून फवारणी केली पाहिजे. चौक्या,गाड्या आणि वसाहतींचे निर्जंतुकीकरण योग्य प्रमाणात झाले तर कामगारात भिती राहणार नाही. म्हणूनच सफाई कामगारांच्या मनातील भिती प्रथम काढली पाहिजे. सफाई कामगारांना स्वच्छता दूत म्हणून आणि माणूस म्हणून वागवा, जीवाची बाजी लावून राबणारे हे कामगार घाणीमुळे अल्पायुषी ठरत आहेत. या कामगारांना सुविधा द्यावा त्यांना चौक्यांच्या ठिकाणी चांगला आहार द्यावा,या कामगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी.कोरोना महामारीला 
सर्व कंत्राटी सफाई कामगार समर्थपणे तोंड देत आहेत. लॉक डाऊन झाल्या नंतर या कामगारांना कायम करण्यात आले पाहिजे. अशी लेखी मांगणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री यांचं कडे केली होती.सदर पत्रात आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत ह्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत पत्र दिले आहे.सदर निवेदन मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.
आता आयुक्तांची बदली झाली असल्यामुळे नवीन आयुक्तांनी सफाई कामगारांच्या मनांत जी भिती निर्माण झाली आहे त्याचे समाधान करावे लागेल. नव्याने आलेल्या आयुक्तांनी सफाई कामगारांच्या समस्या कडे गांभीर्याने पाहावे आणि मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित हे ध्येय ठेवावे.

 निलेश नादावडेकर 9892847838
 (कार्यालय सचिव व प्रसिद्धी प्रमुख )
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटी
संलग्न: स्वतंत्र मजदूर युनियन,

कोरोना आणि क्रिमीलेयर आगरी कोळी ओबीसी.

 कोरोना आणि क्रिमीलेयर आगरी कोळी ओबीसी. 

    कोरोना या जागतिक महामारीमध्ये देशाचा बचाव व्हावा म्हणून अनपेक्षितपणे लादलेल्या लाॅकडाऊन वरचा सामान्य माणसांच्या मनात संशय वाढीस लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री म्हणून गुजरातमधील कारकीर्द ही अल्पसंख्याक मुस्लिम आणि ओबीसी एससी एसटी या हिंदूविरोधी होती. अर्थात भारतीय लोकशाहीला आणि संविधान विचारांना मारक होती. मनुस्मृतीच्या परंपरेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे हेच भाजपा सरकार दिल्लीत स्थिरावल्या नंतर मूळ गुजरात पॅटर्न हा नागपूरकर संघ विचारापेक्षा, पुणेरी पेशवाईस अधिक जवळचा आहे असे दिसू लागले होते. किंबहुना जे ब्राह्मण पेशव्यांना जमले नाही ते मोदी शहा हे मनुवादी वैश्य व्यापारी अधिक प्रभावीपणे करू लागले. त्यात मूळचे क्षत्रिय, भीष्म पितामह शरद पवार हे माझे गुरू आहेत हे सांगून मनुस्मृतीच्या आद्य प्रवर्तक ब्राह्मण पेशव्यांना शह देऊन मोदींनी क्षत्रिय वैश्य युती किती महाभयंकर कारस्थान करू शकते याचे मूर्त स्वरूप म्हणजे जनतेला विचारात न घेता, आणीबाणी स्वरूप लादलेले लाॅकडाऊन होय, 
    सोशल मीडियावरील कोरोना षड्यंत्र उघड होणारे असंख्य युक्तिवाद मोदींना थेट 'मूर्खात' काढत आहेत. मोदी मीडिया जेवढ्या आक्रमकपणे सरकारची बाजू मांडतोय त्यातील विकाऊ पत्रकारिता आता सर्वांच्याच नजरेतून उतरलीय. मनु प्रणित व्यापारी सरकार प्रशासन, मीडिया, विरोधीपक्ष, उद्योजक, न्याय यंत्रणा आणि पोलीस यांच्या मोदिवादी आर्थिक संगनमताने देशालाही विकू किंवा खरेदी करू शकते. वैश्य व्यापारी सत्ताधारी यांचा नफा, फायदा हाच नवा 'राष्ट्रवाद' झालाय. देशाला धोकादायक असलेल्या या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सत्ताधाऱ्यांबद्दल, समस्त ओबीसी एससी एसटी विजेएनटी यांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच जागे केले होते.*
         मासे पकडणा-या  आणि विकणाऱ्या आगरी कोळी कराडी भंडारी महिलांना भरल्या बाजारात घोर अपमान करून हाकलून देणारे पोलीस, महानगर पालिका कर्मचारी ही बनिया मोदी आणि क्षत्रिय पवार युती आहे. एकीकडे साखर उद्योग वाचविण्यासाठी दिल्ली वारी करायची, उद्योगपती आणि उद्योग वाचविण्यासही प्रोत्साहन द्यायचे आणि मच्छीमारी रोजगार संपवायचा हे कोरोना आडून गरीब मागासवर्गीय माणूस मारण्याचे युद्ध आहे. देशात पाशवी सत्तेचा प्रचंड अनुभव पदरी बाळगणाऱ्या पवारांसारख्या अनेक क्षत्रिय नेत्यांना मोदींनी जवळ करून फडणवीस ब्राह्मणांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. अर्थात यात शेतमजूर कामगार स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांचे हाल पेशवाई पेक्षा जास्त वाईट होणार आहेत. हे साऱ्यांनाच समजून आलेय.
       निंबाळकर हे आडनाव छत्रपतींच्या स्वराज्यात गाजलेले असले तरी ते मागासवर्गीय रयतेच्या लोककल्याणाचा मार्ग सोडून मागास पारधी समाज बांधवांचे खून पाडू शकते. कोरोनाच्या काळात जमिनी लाटण्यासाठी आक्रमक झालेला हा सरंजामी जमीनदारांचा धोका कोरोनापेक्षा भयंकर आहे, जीवघेणा आहे.मुबंईत वरळी माहीम हे कोळीवाडे आणि गावठाणे कोरोनासाठी मिडियाकडून बदनाम होत असताना तेथील जमिनी एसआरए प्रकल्पासाठी बिल्डरांना उपलब्ध व्हाव्यात या मूळ उदात्त(??) हेतूने  महाराष्ट्राचे दोन दोन मंत्री ड्रोन विमाने घेऊन कोळीवाड्यात लोकांच्या प्रेमापोटी जातात?. की जमिनीसाठी?. नवी मुबंईत एका आगरी कोळी उच्चशिक्षित नेत्यास राष्ट्रवादीने खरेदी करून, जमिनीच्या धंद्यात क्लस्टरसाठी, भूमाफिया बिल्डर लोढा या मोदींच्या प्याद्यासही आम्ही मागे टालेय हे राष्ट्रवादीने कृतीने सिद्ध केले. सिडको विरुद्धच्या जमीन हक्काच्या लढ्यात पाच हुतात्मे देऊन साडे बारा टक्के जमीन मिळवून देणाऱ्या ओबीसी नेते दि बा पाटील साहेबांच्या आंदोलनाचा पराभव आम्ही विकाऊ आगरी कोळी तरुण नेत्यांना खरेदी करूनच क्लस्टर योजने मार्फत, 95 गावातील कोळीवाडा गावठाणेही उध्वस्त करू हा आगरी कोळी कराडी ओबीसींचा डोळ्यांना दिसणारा मोठा पराभव आता मान्य करायलाच हवा.  
         सिडको नवी मुबंई महानगर पालिकेच्या मोक्याच्या जागी बसलेले क्षत्रिय अधिकारी रोज दहा ते पंधरा तरी आगरी कोळी कराडी घरे पोलीस जेसीबी मशीन घेऊन पाडण्याचे सूडसत्र चालू ठेवून होते. कोरोना मुळे सिडको बंद तर महानगर पालिका आरोग्यासाठी राबतेय. परन्तु याही काळात पनवेल तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीन घेऊन घरे तोडण्यासाठी कारवाई केलीच. 8 मे 2020 या दिवशी रोहिजन बीड ता पनवेल जिल्हा रायगड येथील 75 वर्षाच्या आगरी शेतकरी हशा गणपत पाटील यांना नातवंडांना घेऊन घरातून बाहेर काढण्यासाठी घर तोडणारे अधिकारी मोदींचेही बाप निघाले. मागच्या 35 वर्षांपासून शेती कसणा-या या शेतकऱ्यास जागृत समाजाने कोरोनाच्या संकटात ही पाठीशी उभे राहून हे संकट पळवून लावले. 
     आगरी कोळी कराडी समाजाची गावे गावठाणे गिळण्यासाठी निदान पारधी समाजासारखी हत्याकांडे मुबंई ठाणे रायगडातत, होत नसली तरी, महत्वाची सरकारी पदे, सिडको महानगर पालिकेतील, पोलीस स्टेशन येथे, मोक्याच्या जागी बसलेले हे लोक वेगळे नाहीत!. ब्राह्मण पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या युद्धात, पानिपतावर अब्दालीकडून पराभव मात्र मराठयानचा झाला. या चमत्कारिक लढाईत ओबीसी एससी एसटी अस्तित्वालाही नसावेत?या उच्चवर्णीय इतिहास लेखनामुळे छत्रपतींच्या आरमारात अग्रेसर असलेले आगरी कोळी भंडारी ओबीसी मागासवर्गीय तरुण आज विचारात पडतील?. 
रन्तु या पानिपत कादंबरीचे महान क्षत्रिय लेखक विस्वासराव पाटील यांनी मुंबईतील आगरी कोळी समाजाची गावेच्या गावेच सातबा-यावरून गायब केली. एससी एसटी समाजाच्या 32 झोपडपट्ट्या एका रात्रीत एसआरए कडे वर्ग, निर्गमित करण्याची, पेशव्यांच्या तलवारीस लाजविणारी सनदी लेखणी चालविली. 
    अर्थात मुबंई तील या नव्या एसआरए घपला घोटाळा युद्धात उच्चवर्णीय विश्वास पाटील यांनी आगरी कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी गावठाणे आणि झोपडपट्ट्या गायब करून आम्ही आजही मनुवादी क्षत्रियच आहोत हे दाखवून दिले. मुबंईत असा जातीयवाद असू शकतो यावर भल्या भल्याचा विश्वास बसणार नाही. ओबीसी नेत्यांनाही हे शोषण कळणे अवघड आहे. जे मोदी रस्त्यावरून पायी निघालेल्या असंख्य भारतमाता आणि तिच्या तान्ह्या मुलांना प्रवासाच्या सुविधा, पाणी आणि जेवणाची सोय करू शकत नाही, पण दारुड्यासाठी स्वर्ग आणि नरकाचीही दारे सताड उघडी करतात, उद्योजकांसाठी 68 हजार कोटींची कर्जमाफी, मोफत जमीन, फुकटात 12 तास काम करणारे मोदी गुलामी लादलेले, मजूर देऊ शकतात. ते गरीब मागासवर्गीय भारतास 20 लाख कोटी देणार यासारख्या थापावर आता कुणाचाही विस्वास राहिला नाही.
     शिवसेनेत सत्ता ही क्षत्रियांचीच राहणार हे ओबीसींना आता कळून चुकलेय. कोळीवाडा गावठाणे यांसह मुबंई नवी मुबंई परिसरातील मासे विकण्याच्या जागाही आगरी कोळ्यांच्या आहेत हे गावठाण हक्कात मागील भाजपा सरकारने  मान्य करूनही, आमच्या आया बहिणींना मासळीच्या टोपलीसह सकट हाकलून देणारे हलकट लोक कोण आहेत?. नव्या मुबंईत आमच्या जमिनीवर क्षत्रिय गुजराती बनिया या लोकांचे एपीएमसी मार्केट चालू आहे. ज्यात विक्रमी कोरोना प्रसार होतोय. परन्तु आमच्याच गावात मासळी विकायला फूटभर जागा नाही?भूमिपुत्रांना अर्धे एपीएमसी मार्केट मिळायला हवे. किंबहुना भाजी पाला मार्केट मध्ये समस्त मांसाहारी मागासवर्गीय लोकांना गळ्यांमध्ये 85 टक्के आरक्षण साऱ्या देशात हवे. आरक्षण हा गरिबी हटविण्याची योजना नाही. ते आमचे प्रतिनिधित्व आहे. 
      अहो मुबंई नवी मुबंई मध्ये जे आम्हाला मार्केट मध्ये बसायला आजही जागा देत नाहीत ते स्वातंत्र्य पूर्व काळात आमच्या पूर्वजांसोबत कसे वागले असतील?ज्यांना ओबीसींना काही देण्याची सवय नाही, त्याच्या जागा जमिनी समुद्र अन मासेही केवळ लुटण्याचीच सवय आहे हे जाणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यांने आम्हास ओबीसी आरक्षण दिले. स्वतःस उच्च समजणाऱ्या काही मूर्ख आगरी कोळी ओबीसीनी आम्ही मागास नाही म्हणून आरक्षणाचा तिरस्कार केला. या अतिशहाण्या ओबीसी, कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या डोळ्यात तेव्हा दिवसा तारे चमकले ; जेव्हा महाराष्ट्राच्या स्थापने पासूनच कायम सत्तेत बसलेल्या क्षत्रियांनी "एक मराठा, लाख मराठा" या घोषणेसह केवळ आरक्षणासाठी मोर्चे काढले.
       राम कृष्ण परशुराम यांच्या पेक्षा ही सर्वज्ञानी असलेल्या मोदींनी उचवर्णीय  ब्राह्मणांना 10 टक्के आरक्षण न मागता देऊनही टाकले. काही ओबीसींना हवे असलेले धार्मिक पावित्र्य ही 'आरक्षणास' दिले. मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ओबीसींना जागविण्यासाठी लढणाऱ्या बौद्ध आंबेडकरवादी समस्त मागासवर्गीय भावंडांना आपले म्हणण्याची जाणीव आजही ओबीसींना होत नाही. महात्मा जोतिबा फुले याना गुरुस्थानी मानून लोकनेते दत्ता पाटील, दि बा पाटील, जगन्नाथ कोठेकर, जनार्दन पाटील हे आगरी कोळी नेते आरक्षणाची लढाई साऱ्या महाराष्ट्रात लढले. ओबीसींच्या आरक्षणाला क्रिमीलेयर अर्थात आर्थिक पात्रतेचा निकष लावणे म्हणजे आरक्षण नाकारणे होय!.त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणात उच्चवर्णीय मराठयांना आरक्षण देणे म्हणजे आरक्षण संपविणे होय, हाच निंद्य प्रकार आमच्या एससी, अनुसूचित जातीच्या भावंडांच्या आरक्षणाला क्रिमीलेयर लावून, मोदींचे महागुरू शरद पवारांच्या सरकारने केला. समाजकल्याण मंत्री मा धनंजय मुडे यांनी क्रिमीलेयर लावताच बौद्ध विचारवंत मंडळीत प्रचंड आक्रोश, संताप निर्माण होऊन त्यांनी शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादीस केवळ सोशल मीडियातून लोळविले. जागृत समाज काय असतो हे साऱ्या जगाने पाहिले. आज मा.धनंजय मुडे यांनी या चुकीच्या निर्णयास स्थगिती देऊन एक चांगला निर्णय घेतला. उद्या त्यांचा भुजबळ होऊ नये!.या क्रिमीलेयर विरोधात समस्त सामान्य मागासवर्गीयांना एकीने लढताना मी पाहिलंय यात मा सुनील खोब्रागडे. प्रा हरी नरके , मा श्रावण देवरे , प्रा प्रेमरत्न चौकेकर, प्रदीप ढोबळे आणि नावे माहीत नसलेल्या असंख्य फेसबुक वॉट्सप पोस्टवरील लढाऊ नेते, विचारवंत, आणि  भीम सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मोदीगुरु नमलेत! आम्ही सर्व ओबीसींना हे आंदोलन ओबीसींच्या आरक्षणाला लावलेल्या क्रीमी लेयर काढण्याच्या भविष्यातील लढाईसाठी अत्यन्त महत्वाचे ठरणार आहे.
      घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ओबीसीनी जगले पाहिजे! जागले पाहिजे!! भारतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आमच्या मानवी अधिकारांना कायम नाकारले आहे. आमच्या सर्व स्त्री शूद्रातिशूद्र म्हणजेच आगरी कोळी कराडी भंडारी माळी 52 टक्के ओबीसी यांचे भाऊ एससी एसटी विजेएनटी हेच आहेत .आपण एकत्र लढलो पाहिजे. आपणास आरक्षण हा विषय समजत नसेल तर या क्षेत्रातील जाणकार, लढवय्ये आंबेडकरी बौद्ध बांधवांना सोबत घेऊनच मार्ग शोधला पाहिजे. आपल्या दृष्टीने कदाचित ही आज न पटणारी गोष्ट असेलही! परन्तु मी मागच्या 35 वर्षात जगलो त्या चुकीच्या श्रद्धेपेक्षा, डोळस विवेकी तर्कबुद्धी आहे.  
       मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली खासदारकी लढलो तो सामान्य आंबेडकरी चळवळीचे असंख्य कार्यकर्त्यांचा आदर होता. मी निवडणूक  हरलो असलो तरी माझी दिशा योग्य आहेसंविधानिक आहे, असे आज मला वाटते! मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे.. त्यात आपली जमीन, पाणी समुद्र, जंगले, उद्योग, शिक्षण, आरोग्य, आरक्षण आणि आई एकवीरेंच्या मातृसत्ताक विचारांची ही सांस्कृतिक लढाई आपणही समजून घ्यावी यासाठी प्रबोधनही करणार आहे. कोरोनाच्या आडून होणाऱ्या उच्चवर्णीय अत्याचारांना समजून घेऊन जगुया... समतेचा न्यायाचा भारत घडवू या.

राजाराम पाटील,मो 8286031463 
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र

कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!

 कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!  

जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच 'नजरकैदेत' असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत.. अंत्यत्ययात्रेतला 'शेवटचा' निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली  घटना आम्ही 'उरणकर' अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे नकोच .. अगदी मयताच्या किंवा सांत्वन सोहळ्यासाठीही नको .. असे  'शहाणपण' अनुभवलेले आम्ही!वाढदिवस कसा साजरा करू शकतो?होय तरीही केला आम्ही साजरा एक वाढदिवस! तोही सोशल मीडियावर मुद्दाम, जाहीरपणे सांगण्यासारखा!* 

 *माझ्या बालपणात मी यात्रा जत्रा पालखी सोहळे, शेकडो सण उत्सव यातच मोठा झालो. दरवर्षी मोठ्या उत्साहात चैत्र पौर्णिमेला साजरी होणारी हनुमान जयंती, गणेशोत्सव, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती सोहळे, सत्यनारायण पूजा, हळदी लग्नसोहळे  यांच्याबद्दल 2005 नंतर मात्र, मागे वळून पाहण्याचा सिंहावलोकन करण्याचा दुर्लभ क्षण माझ्या जीवनात आला.

        आगरी कोळी ओबीसी समाजात जन्मलेल्या कुणासही विचार करायला लावणारी ही घटना आहे. अतिशय व्यस्त शहरी शिकवण्या आणि शिक्षकी पेशात असताना देखील गरिबीचे चटके सोसत, निराशेचे जगणे सुखाचा शोध घेतच होते. अचानक सुखाच्या ऐवजी संकटांचा, सामाजिक आघात अनुभवला! आणि मी अंतर्मुख झालो!!  आई वडिलांचे संस्कार नेहमीच आदर्शवादी होते. आईच्या कष्टमय जीवनास पाहून, शेती मासेमारी या व्यवसायी क्षेत्रात बालपणातच, शाळेतल्या शिक्षणापेक्षा मी अधिक वेगाने प्रगती करत निघालो होतो.. परन्तु खेळ व्यायाम आणि अभ्यास यात माझ्या वर्गात नेहमीच पहिल्या नंबरवर ही असायचो. असं असतानाही जेव्हा वयाच्या  35 वर्षी तुम्हास अपयश येते, तेही आयुष्याच्या मध्यावर ही फारच भयंकर कुणालाही निराश करणारी घटना ठरावी! नेहमी खरे बोलावे, चांगले  आचरण ठेवावे, नित्य देवपूजा, मोठ्यांचा आदर, व्यायाम करावा, दारू न पिणे, स्त्रियांचा आदर अशा अनेक चांगल्या सवयी असूनही जेव्हा अपयश वाट्यास येते तेव्हा आजच्या कोरोनासारखीच स्थिती मनात तयार होते. मनःसामर्थ्य दाता, बाबा बुवा,  नवसाला पावणारा ईश्वर  देव, देवळे आणि धर्मही दुःखी मनास, निराश मनास आधार देत नाही. तेव्हा कुणी दारूची बाटली जवळ करतो! जी कोरोनाच्या संकटकाळी आमच्या केंद्र आणि राज्य शासनानेही स्वीकारली!  त्याचे अनुकरण सामान्य माणूसही करतो. व्यसनाने मन शांत होते, झोप लागते हे ही गैरसमज!! उपाय कमी पडले म्हणून आज वस्ती आणि गावात किमान एक  "आत्महत्या" होतेय. आणि सत्ताधारी जातींच्या नियोजनातून उपेक्षित गरीब कोरोनाच्या दुप्पट वेगाने मरतोय.
       मला दारू, मनाची निराशा आणि मानवी अन्याय अत्याचार मारू शकत नव्हते. ही माझ्या आई वडिलांची पुण्याई! तरीही जी काही निराशा होती, ती काही आंबेडकरी भावांनी घालविली. त्यात नवी मुंबईचे अशोक अंकुश, प्रा प्रेमरत्न चौकेकर, शाहीर संभाजी भगत ही नावे अत्यन्त कृतज्ञताा  पूर्वक मी घेईन. या तिघांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 'विचार' मला दिला आणि पाठीवर बंधुत्वाचा 'हातही' दिला. लोकहो इथूनच साऱ्या सण उत्सवाची  मनोमन चिकित्सा सुरू झाली... आर्थिक अपयश, ब्राह्मणी रागाने गेलेली नोकरी,  गरिबी यातूनच जीवनाकडे पाहण्याचा खराखुरा नैसर्गिक, दृष्टीकोन तयार झाला. मित्र फार मोलाचे ठरले. 
       मी आंबेडकरी विचारामुळेच 2006 च्या आगरी कोळी कराडी भूमीपुत्राच्या "रिलायन्स सेझ" विरोधी लढ्यात चिरनेर येथे, लोकनेते दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात लढलो. 'आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी' या माझ्या जातीच्या संघटनेचा जन्मच अशोक अंकुश या आंबेडकरी माणसाने घातला. हे सांगायचे कारण म्हणजे अनेकांना वाटते आंबेडकरी विचारामुळे, चळवळी मुळे लोक स्वतःचा समाज, गाव, परिवारास विसरतात. या आरोपात तथ्य नाही.
        व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन कसे जगावे हे आंबेडकरी भाऊ बहिणींनी मला शिकविले. यानंतर सिडको विरोधी आंदोलनाचे दुसरे नेते दि बा पाटील मला भेटले. राजकीय जीवनात आमदार खासदार आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष पदी पोहचलेल्या या दोन्ही नेत्याच्या जीवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि एकविरापुत्र बुद्ध ओतप्रोत भरले होते. वर्तमान राजकीय अपयश अनुभवणा-या  ओबीसी नेत्यांसाठी, समजून घेण्यासारखे,  अभ्यासण्याजोगे हे कटू सत्य आहे. या दोन महान, उत्तुंग आगरी नेत्याच्या माध्यमातून मी खोती विरोधी शेतकरी चळवळ, चवदार तळे पाणी हक्क चळवळ, चिरनेर जगल सत्याग्रह, मनुस्मृतीदहन यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी पेरलेले माझ्या समाजाचे "उत्कर्षबिंदू" अभ्यासले.
         आज व्यक्तिगत जीवनातील सुख शांती खुशी आणि सार्वजनिक जीवनातील उभारी 2005 ते 2020 या 15 वर्षाच्या छोटेखानी झंझावाती कालखंडात, सुरुवातीच्या जीवनातील आर्थिक अपयशाचा शिक्का मी पुसून टाकला. बिकट झालेला रायगडच्या लोकसभेचा बंद दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न आज मी करतोय. रायगड जिल्ह्यात दि बा पाटील यांच्यानंतर घातलेली दिल्ली बंदी अधिक मजबूत करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जमीनदार खोत बुवा बापू यशस्वी झालेत. 
         "दोनच राजे इथे जाहले !! या कोकण पुण्यभूमीवर.. एक त्या रायगडावर! एक चवदार तळ्यावर..!" आंबेडकरी चळवळीतील हे लोकप्रिय गीत, मला छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंचित रयतेची, मागासवर्गीय भारताची, दिल्लीवर राजकीय स्वारी करण्याची संधी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनीच  दिलीय. ओबीसींच्या जीवनातील हा आंबेडकरी राजकीय विचार हा असा सहज रुजलाय.
        आई एकविरा ही बुद्धाची आई आहे हे जागतिक इतिहास शास्त्रीय पुरातत्वीय संशोधन पुण्याच्या प्रा विजय गायकवाड, अण्णा त्रिभुवन, भन्ते विमलकीत्ती याच्या सहवासात घडलेली बेलापूर पीपल्स एज्युकेशन मधील छोटीशी घटना, आज जगाला हुंडा नाकारणाऱ्या महान एकविरा मातृसत्ताक संस्कृतीकडे घेऊन जात आहे, जीचे मूळ मोहेंजोदडो येथील प्राचीन नदी किनारे, सागर किनारे आणि आजच्या कोळीवाड्यातील समृद्ध स्त्री संस्कृतीकडून कार्ला एकविरा बौद्ध लेण्यातून, नवी मुबंई विमानतळात उध्वस्त होणाऱ्या, 2000 वर्षे जुन्या सम्राट अशोकाच्या, मातृसत्ताक केरुमाता लेणी बचाव आदोलनाची क्रांतिकारी शिकवण, आगरी कोळी कराडी ओबीसी समाज बांधवांना देतेय.
          आज देशाची सत्ता मनुवादी मोदींच्या हाती असून स्त्री शुद्रातिशूद्र शेतमजूर कामगार मच्छीमारांच्या भारतास अत्यन्त भयानक मरण यातना देत आहे. 2005 पूर्वीच्या माझ्या जीवनातील अनुभव आजच्या कोरोना घरबंदी सारखेच होते. ओबीसींची मनातील भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. "देवांनी मैदान सोडलंय..?" ती साऱ्या देशाची व्यथा कोरोनाकाळातच व्यक्त झालीय! माझ्या वाचनात अशी पोस्ट आलीय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतही कुठंतरी कुजबुजले, 'मुझे "धर्मने "निराश किया...!'  या साऱ्यांचा अर्थ एकच! आज माणसाला माणूस आणि माणुसकीच वाचवू शकते..  
            इथूनच पहिल्या भारतीय माणसाची जयंती सुरू झाली असावी ! त्या महामानवाचे नाव "डॉ बाबासाहेब आंबेडकर"! मानवी कर्तृत्वाचा उत्सव करण्याचा प्रामाणिक पणा शिवजयंती, महात्मा  जोती सावित्री जयंती कडून, आम्ही आता आता आगरी कोळी ओबीसी नेते दि बा पाटील दत्ता पाटील या आमच्यातील कर्तृत्वान माणसाच्या जयंत्या साज-या करून करतोय. बौद्ध लेण्यांच्या जागतिक अभ्यासातून आई एकवीरेंच्या जन्माची तारीख आणि आई वडिलांची नावेही आम्ही शोधलीत! तीही एक माणूस आहे! देवी नाही!! एका शस्त्रहीन, अहिंसक प्रेमाने जग जिकणा-या, महान विरास जन्म देणारी एकविरा आई आहे. 
        आज देव नाकारून अनेक कर्तृत्वान, हुशार माणसे आंबेडकरी चळवळीने जन्मास घातली; शिक्षण आणि बौद्ध विज्ञानवादी संस्काराने घडविलेली. मी या  सर्वांची नावे येथे घेत नाही. परन्तु नवी मुबंई विमानतळ आणि मुबंई गावठाण हक्क, जमीन हक्क लढे लढत असताना संपर्कात आलेले आंतरराज्य आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील  कोरोनाग्रस्त गरीब माणसांना, प्रसिद्धी पासून दूर राहून, गुप्तपणे अन्नदान देणाऱ्या अनाम वीरांना मी धन्यवाद देईन. अर्थात त्या दानाची गरज, या क्षणापासून वाढत जातेय.. याचीही जाणीव करून देत देतच.. मी एका मोठ्या मनाच्या माणसाचा ..डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस घरी राहून साजरा केला. अर्थात धम्म, धान्य दानाने..!!केवळ राजकीय नेतृत्वच लोकांना न्याय देऊ शकते, हा माझा गोड गैरसमज दूर करणारे माझे आदर्श, आयएएस अधिकारी, महाराष्ट्राच्या उद्यागो विभागाचे सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी!. या अगोदर मा किशोर गजभिये, मा आर के गायकवाड यांच्यासारख्या एकापेक्षा एक हुशार अधिकाऱ्यांना मी भेटलोय त्या सर्वांची नावे घेणे जागेअभावी शक्य नाही. मानवी कर्तृत्वाचा आंबेडकरी पराक्रम लिहिण्यास जागा अपुरी पडावी! हा संदेश देणारी  आंबेडकरी बौद्ध धम्म चळवळ ही जगातील डाव्या आणि उजव्या चळवळीचा मेंदू आणि मणका यांना नवं मानवतेचा संदेश देणारी जागतिक चळवळ ठरावी! माझ्या मनातील याच विचारांमुळे, आजच्या कोरोनाच्या अंधारातही दिवा पेटवायची इच्छा असेल, तर तो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाच्या आदर्शचाच असावा. डॉ हर्षदीप कांबळे यांनी प्रचंड संघर्षातून शिक्षण घेऊन देशासाठी जे योगदान दिलेय तो माझा आणि ओबीसी समाजाचाही आदर्श ठरावा यात मला अजिबात शंका वाटत नाही. "मुक्ती कोण पथे" या मार्गावर माझ्या जीवनात, जागतिक बौद्ध धम्म परिचय, विनयशीलता, दान पारमीता या जीवन मूल्यांचे संस्कार  आणि उद्योगाचेही जागतिक मार्ग खुले करणारे ठरले.
        कोळीवाडे आणि गावठाणे यांच्याशी सरकारच्या विविध विकास योजना जोडणारे डाॅ हर्षदीप कांबळे सागरपुत्र ओबीसी समाजातील उद्योजक तरुणास अनुकरणीय आहेत. थायलंडच्या बौद्ध उपासीकेशी विवाहबद्ध होत जातीअंत लढ्यातील आंतरजातीय, आंतरदेशीय विवाहांना नवा आदर्श  देणारे दांपत्य म्हणून जागतिक कौतुकास पात्र आहेत. सत्ता संपत्तीचा कौटूंबिक, खानदानी(उच्चवर्णीय) मोह टाळण्यासाठी स्वतःचे मूळबाळ जन्मास न घालता साऱ्या देशातील जगातील अनाथ, उपेक्षित, मागासवर्गीय बालकांना वात्सल्य देणाऱ्या या महान पतीपत्नीना मी कोरोनातही शुभेच्छा दिल्या नाही तर, ती कृतघ्न पणाची मोठी चूक होईल.
        आज साऱ्या जगात राजकीय नेतृत्वाला लोक संशयाने पाहत आहेत. देशबंदी शहरबंदी, गावबंदी, घरबंदी आणि माणसाने माणसाला  भेटण्यासाठी घातलेली बंदी, मोदिवादी नव अस्पृश्यता याची तपासणी नागरिक करू लागलेत. या संकट समयी साऱ्या जगालाच नवी मानवी मूल्ये देणारी एकविरापुत्र बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडर यांच्या सारखी कमळपुष्पे या खंडप्राय मातृसत्ताक भारतमातेला हवीत. त्या मानवी मूल्यांचा आदर्श देणारे अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे हे माझ्या दर्या किनाऱ्यावरील घरी भात मासे खाऊन गेले .. म्हणूनच बंधुत्वाचा अधिकाराने हे लिहिले... स्वतः त्यांनी आणि कुणीही यास "व्यक्तिपूजा" समजू नये.

राजाराम पाटील  मो 8928452112,उरण.रायगड
अध्यक्ष:आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी       

कोरोना काळात माणुसकी हरवत चालली आहे की काय?.

 कोरोना काळात माणुसकी हरवत चालली आहे की काय?.

  देशावर आलेल्या कोरोनाने संपुर्ण जगात हाहाकार माजवून ठेवला आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी प्रत्येक देश सज्ज होत आहे. प्रत्येक देश त्यावर मात करण्यासाठी आपली कसोटी देत आहे. अनेक तज्ञ दिवस रात्र एक करून ह्यावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 
देशांतर्गत असलेला कोरोना कधी आपल्या देशात पोहचला कळलच नाही.
सुरुवातीच्या काळात कोरोना फक्त बाहेरगावावरून आलेल्या लोकांनाच होतो, अशी मानसिकता तयार झाली होती. पण हळू हळू ही मानसिकता संपुष्टात येत गेली कारण कोरोना कुणालाही होऊ लागला होता. त्याने आपला प्रसार लांबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आणि शासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करणे, आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी तसेच आपल्या देशासाठी फायदेशीर आहे.
आपल्या विभागात आपल्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कोरोनाची लागण झालेली आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा प्रत्येकजन असा वागायला सुरुवात करतो की जणू त्या परिवाराला त्या व्यक्तीला आपण वाळीत टाकतोय.. कोरोना तर सोडा ज्या व्यक्तीला कॉरंटाईन केल जात त्या व्यक्तीला ही तशीच दुजाभावाची, वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. ज्या मुबंईबद्दल मुंबईकरांबद्दल बोलल जायच की 'मुंबई प्रत्येक संकटात प्रत्येकासाठी धावून जाते. इथे आजूबाजूवाले नातेवाईकांपेक्षा ही लवकर धावून जातात.' त्याच मुंबईत आता कोरोना झाला असे माहित पडले तरी लोक संबंधच तोडून टाकतात.
वर्षानूवर्षं असलेले जीवाभावाचे संबंध लगेच तोडून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या परिवाराला अक्षरशः खूप वाईट वागणूक दिली जाते. आपल्याला ठीक आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे पण म्हणून आपण अस वागलं पाहिजे का?. आपण धीर देण्याऐवजी त्या व्यक्तीच त्या परिवाराच मानसिक संतुलनच बिघडवून टाकतो ज्याला आपल्या धीराची, आपल्या सोबत असल्याची गरज असते त्याला आपण भीती पोटी अक्षरशः मरणाच्या दारात ढकलतो. आपल्याला कोरोना सोबत लढायचं आहे कोरोना झालेल्या व्यक्ती सोबत नाही. हे मोबाईल रिंग टोन ऐकून लोकांची मानसिकता बदली होईल काय?.
जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका,पोलिस यंत्रणा, मिडिया, इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहेत.आणि आमच्या देशात,राज्यात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी , पोलिस यंत्रणा, मिडिया, हे एकत्र येऊन कोरोना लढा देत आहेत. आणि विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. देश, राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं आजच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां,त्यांच्या भक्तांना कळत नाही हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे.
कोरोना गरिब, श्रीमंत, उद्योगपती, सत्ताधारी पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते वगैरे असा भेद भाव करत नाही, कोरोनाची लागण कोणालाही व कधींही होऊ शकते.तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना एकच हात जोडून विनंती आहे की, तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी एकत्र येऊन काम करा. राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवेल
कोरोना आज आहे उद्या जाईल, पण आपण आज जे वागलेतोनागरिकांना दिलेली वागणूक आयुष्यभर त्या परिवाराला,  त्या परिवाराच्या प्रत्येक सभासदाच्या मनावर कोरली जाईल. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घ्या. आपल्याला कोरोना सोबत लढायचं आहे कोरोना झालेल्या व्यक्ती सोबत नाही..

प्रशांत तायडे,९८३३८४१३०९,भांडूप मुंबई.

बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना

 बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटात आहे,त्यामुळे सर्व उत्साहावर पाणी फिरले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची 129 वी जयंती जगभर उत्साहाने घरा घरात साजरी झाली.त्यांची गिनीज बुकवाल्यांना नोंद घ्यावी लागेल. कारण नेहमीच निळे वादळ ठरणारी भिम जयंती प्रथमच शांततेने साजरी झाली. दरवर्षी भिम जयंतीनिमित्त जाती व्यवस्था खेडया पाडयातच नव्हे तर शहरी भागात डोके वर काढण्याचा प्रयत्न करते.यावर्षी कोरोनामुळे काहीच घडले नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटालुन हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो.म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची १२९ वी जयंती असो या बुद्धाची (२०६५ वी ) जयंती असो आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो.विचार आणि त्यानुसार आचरण नाही.

भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो.धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही.बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे  महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारा वर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.याची आठवन आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान.

धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ,संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.हे रिपब्लिकन आणि आंबेडकरी समाजाला कोण सांगेल?. आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेउन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल.केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.

माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळी कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात.

श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही  शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात.  एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणा साठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळी बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना.हिच सर्वाना नम्र विनंती, आणि हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!

सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई

(विशेष सूचना लेख प्रसिद्ध केल्यास pdf माहितीसाठी इमेलवर पाठवावी हि नम्र विनंती )


कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !

 कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !       

         भारतातील मागासवर्गीय स्थलांतरित मजूर व त्यांचे मोलमजुरीचे एकदिवसीय रोखीचे "अर्थशास्त्र" समजून न घेता, आकस्मिक लादलेली नोटबंदी यास अनेकजण मोदींचा मूर्खपणा समजत होते. ती फार मोठी चूक होती. पाशवी बहुमत घेऊन निवडून आलेल्या भाजपा समोर शहाण्या देशवासियांनी मान मोडेपर्यंत झुकल्यामुळे, नोटबंदीत आपले नागरिक मृत्यूमुखी पडूनही, आम्ही शांत होतो. हे मोदी भाजपाचे सरकारी हत्याकांडच होते! काँग्रेसी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणी विरोधात देश निकराने लढला होता. तशी लोकशाही पूरक, परिस्थिती मोदींनी ठेवली नाही. लोकशाहीत अत्यन्त महत्वाचा असलेला विरोधी पक्ष आणि जागृत पत्रकाकरितेचा स्तंभ उलटा उभा करून, हुकूमशाहीच्या समर्थनार्थ उभ्या करणाऱ्या (वैश्य) शहा मोदी यांचे राजकीय कौशल्य, जुलमी भारतीय प्रशासकांच्या यादीत इतिहासाने नोंद घ्यावे एवढे मोठे काळेकुट्ट आहे! मोदींना ज्या पद्धतीने मीडियाने प्रमोट केले आहे, ते पाहता मोदींचे वक्तृत्व फेका फेकी करणे आणि मूल्यहीन, तत्वहीन, जुमलेबाज राजकारण आहे. यापेक्षा मनु समर्थक गोळवलकर, अटलजी, अडवाणी हे अधिक प्रभावी वक्ते होते. अयोध्येत अस्तित्वात नसलेल्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन, हिंदू मुस्लिम दंगली पेटवून, सत्तेपर्यंत वाटचाल करणाऱ्या संघ परिवारास, देशाला भ्रमित करण्याचे सूत्र चांगले गवसले आहे.
       कोरोनाच्या चर्चेने जग भयभीत झाले असताना, आपल्याला हव्या त्या वेळी लाॅकडाऊन जाहीर करण्यात मोदींचा हिटलरी दुरदर्शीपणा, संघ भाजपात एकमेवाद्वितीय ठरला असला तरी आपल्या लोकशाही देशासाठी मात्र इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीच्या धोरणांनाही लाजविणारा ठरला. स्वातंत्र्या नंतर देशाचे कधीच भरून न येणारे नुकसान मोदी सरकारने केले आहे.
       साऱ्या जगास आशादायी वाटत असलेली नवशिक्षित तरुणाई मोदींनी आपल्या सतत नफा पाहणाऱ्या व्यापारी वृत्तीने निकामी करून टाकली आहे. ठरवले असते तर याच तरुणांनी कोरोनाच्या काळात खूप चांगल्या गोष्टी, देशाने मागील काळात लढलेल्या युद्धाप्रमाणेच यशस्वी केल्या असत्या. कोरोनाच्या मृत्यूचे भय उभे करून मोदींनी लपून छपून घेतलेल्या देशविरोधी निर्णयाची भरपाई आपणा सर्वानाच करावी लागणार आहे. नोटबंदी आणि कोरोना बंदी ही हुकूमशाहीच्या पेक्षा वेगळी गोष्ट नाही हे लवकरच साऱ्या भारतीयांच्या लक्षात येईल. छापील वृत्तपत्रे घराघरात वाटल्याने कोरोना प्रसार होतो आणि दारूविक्रीने महसूल मिळतो.. हे नागरिकांवरील सरकारचे प्रेम नाही,  तर जागृत लोकशाहीवर मद्य आणि मदिरालये यातून लादलेले बेहोशीचे षड्यंत्र आहे.
        2500 वर्षांपूर्वीचे भारताचे महान सुपुत्र भगवान बुद्ध यांनी पंचशील देऊन सांगितले होते. मद्यपान न करणारे शीलवान लोक उभे करण्याचा संकल्प करा आणि लोकशाहिस अनुकूल समाज उभा करा. चारित्र्याच्या गोलगप्पा मारणाऱ्या भाजपायी लोकांकडून ही अपेक्षा करणे चुकीचे असले तरी देशाला दारूने बेहोष करण्याचे मोदींचे हेतू कोरोना पासून देश वाचविण्याचे निश्चित नव्हते आणि नाहीत.
        जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात मोठे लिखित संविधान ही आपल्यासाठी अत्यन्त अभिमानास्पद बाब असली, तरीही कॉग्रेस भाजपा हे दोन्ही पक्ष हुकूमशाहीच्या समर्थनातले राजकीय पक्ष आहेत. अर्थात लोकशाहीच्या कायम विरोधातील पक्ष आहेत हे सहज लक्षात येते. या दोन्ही पक्षात मुख्य नेतृत्वात, चालक असलेली मंडळी मनुस्मृतीच्या शिकवणुकीतील वृत्तीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मंडळी आहेत. या देशातील बहुसंख्य शूद्र स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी, विजेएनटी या 85% भारताचे ते कायम शत्रू राहिले आहेत. प्रत्यक्ष करोनाग्रस्त म्हणून जे सरकारी दवाखान्यातून जिवंत बाहेर आले आहेत त्यांनी सरकारची लायकी जवळून पाहिली आहे. स्थलांतरित कामगारांनी आपले मरण याची देही याची डोळा पाहिलं आहे. आणि घरात बसून सुरक्षित जगलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना पुढच्या गरिबीचे धोके पाहून मानसिक मरण समोर दिसतेय.
          भारतीय प्रार्थनालयांतील बंदिस्त अर्थशक्ती ही, जगातल्या समस्त भाडवलंदारांना लाजविणारी असूनही, ती भारतीय मार्क्सवादी विचारवंतांना आजपर्यंत दिसली नाही? परन्तु मूळ (क्षत्रिय) मराठा मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिसली. देशात आज गरिबी आहे हे कॉग्रेस नेते राहुल गांधी,  सोनिया गांधी यांना कळतेय ही घटना खरोखरच कौतुकाची आहे! कारण संघ परिवास ते खोटे वाटतेय. पृथ्वीराज बाबा यांना साऱ्या देशाने पाठींबा दिला असता तर आज गरीब भारताला खूप मोठा  ऐतिहासिक न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात कॉंग्रेसला म्हणजे मराठ्यांना मंदिरातील ब्राह्मण विरोधात फक्त खुर्चीचे राजकारण करायचे होते. बाकी मनुस्मृतीच्या जानव्यात ब्राह्मण मराठे कायमचे बांधलेले आहेत, हे समस्त मागासवर्गीय भारतीयांनी समजून घ्यावे. लाॅकडाऊन मुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधात कामगार, विद्यार्थी, शेतमजूर यांच्यात प्रचंड असंतोष आहे. घरा घरात नोटबंदी आणि कोरोनाबंदीने गरिबीचा उच्छाद मांडलाय! असे असूनही महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे सरकार विरोधी सत्तेचे निर्लज्ज राजकारण करतात. त्यांच्या ब्राह्मणी स्वभावाचे मूळ शोधण्याचा मी इतिहासात शोध घेतला. महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध मराठे हे खरे विरोधी पक्ष आहेत. सर्वाधीक मुख्यमंत्री आणि सत्ता ही ब्राह्मण, क्षत्रियांचीच असते. मुख्यमंत्र्याची यादी पाहून हे सहज लक्षात येते. त्यामुळं फडणविस याना देशातील केंद्र सरकारच्या घोडचूका दिसत नाहीत परन्तु ठाक-यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या क्षत्रिय सत्तेला विरोध म्हणून राजकारण सुचते. या उच्चवर्णीय राजकीय निगरगट्ट पणास आतातरी ओबीसींच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. इतिहासातील हा ब्राह्मण क्षत्रिय वाद हा एकमेकांच्या उरावर बसवून सत्तेचे लोणी आपापसात वाटून खाण्याचा आहेच परन्तु तो समस्त ओबीसींच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याचाही आहे. उच्चवर्णीयामधील ही मैत्रीपूर्ण लढत मागासवर्गीय बांधवाच्या विरोधातील आघाडी आहे. ब्राह्मण क्षत्रिय यांच्यातील हा वर्ग संघर्ष देशाला परकीयांच्या गुलामीत गाडणारा होताच परन्तु आजच्या कोरोना महामारीत पूर्णपणे उध्वस्त करणारा ठरू नये ! 
        प्राचीन हिंदू वैदिक साहित्यातील काही ठळक घटना मुद्दाम देत आहे. पहिला संघर्ष हा राजा वेणा यांच्याविरोधात होता. दुसरा संघर्ष राजा पुरुवंश ब्राह्मण वशिष्ठ व राजा नसलेल्या साध्या क्षत्रिय विश्वामित्र यांच्यातील होता. कृतवीर्यच्या क्षत्रिय वंशजांनी भृगु ब्राह्मण शिष्याची सामूहिक हत्या केलेल्या घटनेचीही नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ब्राह्मणाच्या वतीने सर्व क्षत्रिय वर्ग नष्ट करणाऱ्या परशुरामाची नोंद करण्यात आली आहे. हा संघर्ष इतका मोठा होता की क्षत्रियांनी ब्राह्मण होऊ नये असाही संघर्ष झाला होता .प्रथम कोणी कोणाला नमस्कार करायचा, वादात माघार कोणी घायची हाही संघर्ष झाला होता. या वर्गयुद्धाचा खरा फायदा ब्राह्मणांनाच झाला होता. ब्राह्मण क्षत्रिय वादाचा प्रभाव हा केवळ राजकारणा पुरता मर्यादित राहील नाही तर प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्था, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रावर आज त्याचा परिणाम जाणवतोय. हे परिणाम लोकशाही आणि मागासवर्गीयांच्या विरोधात गेलेत म्हणूनच त्याची थोडक्यात चर्चा आम्ही केली! 
          प्रवासी मजुरांना रेल्वे नाकारण्याचे केंद्रीय राजकारण आणि त्याचे समर्थन करणारे फडणवीस हे केवळ कॉंग्रेस राष्ट्रवादी ठाकरे सरकारचे विरोधक नाहीत तर मूळ मागासवर्गीय स्थलांतरित मजुरांचे हाडवैर जपणारे ब्राह्मण आहेत. त्यामुळं मोदींचे 20 लाख कोटी 85 टक्के मागासवर्गीय भारतीयांकडे कधीच पोहचणार नाहीत. ब्राह्मण क्षत्रिय युद्धात आम्ही केवळ  टाळ्या थाळ्या वाजविणारे प्रेक्षक राहणार. पुलवामा हत्याकांड ज्या पद्धतीने मोदी मीडियाने समोर आणले तसे धावत्या रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या मजुरांसाठी माफीचा एकही शब्द नाही. साधूंच्या हत्याकांडाची देशव्यापी आग पेटवू पाहणाऱ्या महाराष्ट्र भाजपला, मागासवर्गीयांचे पारधी हत्याकांड का दिसू नये? तेथे उच्चवर्णीय युती होते. हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान यांच्यातील वादात, मारणाऱ्या मुस्लिम हल्लेखोर आरोपींना "आतंकवादी" "दहशतवादी", म्हणणारे उच्चवर्णीय विचारवन्त, जमिनी ताब्यात घेण्यासाठी साठी जमीनदारी सरंजामी क्षत्रिय वृत्तीने, पारधी समाज बांधवांचा खुले आम जीव घेणा-यांना काय म्हणणार आहेत?.  
       अलीकडे जय भीम बोलू लागलेल्या पुरोगामी जमीनदारांनी माफी मागून नव्या भारताची समतेची न्यायाची सुरुवात करायला हरकत नव्हती? भगवान महावीर, भगवान बुद्ध यांनी सांगितलेल्या विनयशील वृत्तीने अयोध्येत सापडलेल्या बौद्ध अवशेष आणि पुरावे पाहून सामुराई योध्याप्रमाणे देशासमोर नम्र व्हावे, सामाजिक आर्थिक, राजकीय न्यायाची लोकशाही स्वीकारावी. गदा चक्र धनुष्य परशु ही चिन्हे हिंसेची प्रतीके सोडून भगवान बुद्धाची  पंचशील वृत्ती स्वीकारावि!.
        लवकरच लाॅकडाऊन उठेल आणि नवी मुबंई, उरण,  पनवेल येथील बिल्डर भूमाफिया जागे होतील. सिडकोतील,  महानगरपालिकेतील उच्चवर्णीय अधिकारी ओबीसी आगरी कोळी कराड्यांची घरे पाडायची कारवाई सुरू करतील. कोरोनापूर्व काळात विशाल ढगे या सिडको अधिकाऱ्याने कळंबोली नवी मुबंई येथील राजेश परशे या कोळी बांधवांचे घर बायको मुलांना घरातून खेचून काढून, अपमानित करून पाडले. चौकशी अंती 16 कोटींची जमीन बिल्डरला देण्यासाठी, केल्या गेलेल्या आर्थिक घोटाळ्याचे हे प्रकरण होते. एक ओबीसी प्रकल्पग्रस्तास रस्त्यावर आणताना वापरलेले 500 पोलिसांचे पथकच (क्षत्रिय वृत्तीने) बेकायदेशीर पणे ही कारवाई करत होते. मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा या गरीबाचे घर बांधायचे जाहीर आदेश देऊनही न्याय मिळत नाही. अर्थात हे राज्य क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांच्या अत्याचाराच्या समर्थनाचेच "उच्चवर्णीय राजकारण" करते. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प, कोस्टल रोड, नयना सिडको प्रकल्प आगरी कोळी कराडी ओबीसींची उध्वस्त गावठाणे, शेती मासेमारी, रेती, वीटभट्टी व्यवसाय,महाराष्ट्रातील मागासवर्गीय लोकांच्या इज्जतीवर संपत्तीवर पडणारे हे हात मनुस्मृती प्रणित उच्चवर्णीयांचे असतील तर त्यांना शासन करणार कोण?.. स्त्री शूद्रातिशूद्रांच्या या ऐतिहासिक दुःखाच्या मुळाशी जाऊन शब्दात गुन्हा पकडायचाच झाला तर समस्त मागासवर्गीय बांधवांनो हा उच्चवर्णीय "आतंकवाद" "दहशतवादच" आहे. ब्राह्मण क्षत्रिय याच्या जुन्या सत्ता संघर्षात तुमची सत्ता सोडा! प्राण रक्षणासाठी तरी तुम्हास लढावे लागेल!! अर्थात बेकारी, गरिबी, महागडी औषधे, आमच्या जीवावर उठलेली उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय महाआघाडी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजून येवो.  राज्यपालांकडे वारंवार फेऱ्या मारणाऱ्या वामन फडणविसाना महाराष्ट्राची सत्ताच हवी हे एक ओबीसी शुद्रच सांगू शकतो!

राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र.

कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !

 कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !

आपल्या श्रमाने देशाचे उद्योग व्यवसाय उभे करणाऱ्या, प्रचंड फायद्यात आणणाऱ्या स्थलांतरित मागासवर्गीय, कामगारांना रेल्वे प्रवास नाकारणारे मोदी गरिबांचे शत्रू ठरले. याच मोदींनी उच्चवर्णीय ऐतखाऊ, कर्जबुडव्या उद्योगपतींना, 68 हजार कोटींची कर्जमाफी केली. मनुस्मृती प्रणित मागासवर्गीय  जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात ज्यांनी वॉट्सप, फेसबुक या सोशल मीडियावर, कष्टकऱ्यांच्या बाजूने लीहिले ते संविधानिक शहाणे ठरले. कोरोना आडून 85 टक्के मागासवर्गीय भारतीयांना जगणे असह्य करणाऱ्या मोदींच्या अंधभक्तीने थाळ्या वाजविणारे,  मेणबत्त्या पेटविणारे  सध्याच्या जागतिक वातावरणात मूर्ख ठरले आहेत.
  अमेरिकन अध्यक्ष असलेल्या ट्रम्प तात्यांना गुजरात मध्ये आणून स्वतःच्या हुकूमशहा वृत्तीचे ब्रँडिंग बनवू पाहणाऱ्या मोदींनीच, खऱ्या अर्थाने कोरोनासाठी पायघड्या घातल्या होत्या. स्वतःच्या पाप कृत्यास, पुण्यकर्म ठरविण्यासाठी तब्लिकी मुस्लिम आणि वरळी कोळीवाड्यातुन कोरोना प्रसार होतोय असे धादांत खोटा दिशाभूल करणारा गोबेल्स नीतीचा प्रचार प्रसार मोदी मीडियाने भरभरून केला. 
   मोदींच्या अमेरिकन ट्रम्प कार्डची जागतिक विश्वासार्हता  आता संपली आहे... जागतिक स्तरावर मोदी आणि ट्रम्प हे भूमीपुत्रावर अन्याय करणारे वर्णभेदी मनुवादी नेतृत्व आहे, हेच सत्य कोरोनामुळे समोर आले आहे. विज्ञानवादी अमेरिकेत मोदींचे भारतीय शेटजी भटजी उद्योगमित्र आजही अन्यायाचीच बाजू उचलत आहेत. त्यामुळे  मनुस्मृती समर्थक भाजपने आता ट्रम्प सारख्या अत्याचाऱ्यांना सोबत घेऊन मनुस्मृतिस आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारित आणि संघटित केले आहे. 
    कोरोनाच्या जागतिक महामारीत मोदींसारख्या नेतृत्वाची मानवतेच्या जीवनमूल्यांवर परीक्षा झाली. त्यात मोदी नापास झाले तेही अमेरिकन अध्यक्ष मित्राला घेऊनच! आज अमेरिकेस "नो जस्टीस नो पीस" या भूमिपुत्र आंदोलनाने घेरले आहे. जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत अमेरिका शांत नाही. जॉर्ज फ्लाॅईड या मूळ भूमिपुत्र अमेरिकन (काळ्या) अर्थात आपल्याकडे मागासवर्गीय माणसाला (गोऱ्या) उच्चवर्णीय पोलिसाने निर्दयपणे मारले. याविरोधात अमेरिकन व्हाइट हाऊस समोर गगनभेदी निदर्शने जनता करीत आहे. मोदी मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना जमिनीखाली बनविलेल्या भुयारात अर्थात पाताळात लपून बसावे लागतेय. भूमिपुत्र अमेरिकन माणसावर अन्याय झाला म्हणून तेथील उच्चवर्णीय सुद्धा भूमीपुत्रासाठी एकत्र लढत आहेत ही अमेरिकन लोकशाहीची अभिमानास्पद गोष्ट भारतात अत्यन्त दुर्मिळ आहे.  
    रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृती दहन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काही उच्चवर्णीयांनी अशी साथ दिली होती. परन्तु आज अमेरिकेत नोकरीसाठी गेलेले अनेक उच्चवर्णीय भारतीय, मोदीप्रमाणे ट्रम्प तात्याच्या सोबत आहेत. अमेरिकन पोलिसांनी गुढघे टेकून आंदोलकांची माफी मागितली आहे .भारतीय पोलिसांना जनतेच्या सेवेसाठी हा मोठा आदर्श ठरावा.. कोरोना च्या आडून आणलेल्या बेरोजगारीमुळे, शहरे सोडून गावाकडे पायी निघालेल्या कामगारांच्या अतोनात हाल अपेष्टा, रेल्वे खाली चिरडून झालेले अमानुष मृत्यू यांना मोदीच जबाबदार असताना भारतात मात्र अशी आंदोलने होत नाहीत. येथे मना मनात जो मनुवादी विषमतावादी विचार पुराणे, रामायण, महाभारत या महाकाव्यातून बिंबविला गेलाय त्यात कष्टकरी भूमिपुत्र (शूद्र)ओबीसी यांच्या जीवाला काही किंमत नसते. त्याची संपत्ती आणि जीव याचे काय करायचे हे ठरविण्याचे सर्वाधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे असतात. असे मनुस्मृती सांगते. अमेरिकेत मनुस्मृतीच्या तोडीचा ग्रंथ लिहिणारा विचारवन्त महापुरुष(?) झाला नाही. त्यामुळेच तेथे शांती नाही. 
     त्यामानाने मोदी खरोखरच महान आहेत. नोटबंदीत शेकडो लोक रांगेत उभे राहिल्यामुळे चक्कर येऊन तर हजारो गरिबीच्या चरख्यात चिरडून मेले. कोरोनात गरिबीमुळे, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मूळ भूमिपुत्र मागास जनता (काळे) मरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याच पावलावर पावलं टाकत मोदी भारतीय मागासवर्गीय माणसांना आरोग्याच्या सुविधा नाकारण्याची युक्ती वापरून मारणार नाहीत ना? अशी भीती निर्माण झालीय!.
    जगात सार्वजनिक आरोग्य सेवा नेहमी उपेक्षित शोषित यांनाच लागतात. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. श्रीमंतांना खाजगी दवाखाने कुठेही उपलब्ध असतात. गरिबीचे हे जागतिक सत्य जाणून जगातले सारे राज्यकर्ते गरीब जनतेसाठी मोठं मोठी हॉस्पिटल्स बांधतात. आमच्या कडे मंदिर  निर्माणाच्या प्रचारानेच सत्ता मिळते त्यामुळं मंदिर अर्थशास्त्र हाच इथल्या मोदिसत्तेचा गाभा आहे. मोदींच्या नियोजनशून्य नोटबंदी आणि लाॅकडाऊनमुळे भारतात होणारे मागासवर्गीय गरीबाच्या हत्या, अत्याचार यांच्या विरोधात लिहिणारे खरोखरच वीर पुरुष आहेत. 
     अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड प्रमाणे त्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये अशी विनंती या सर्वांच्या वतीने मी मोदींना करतोय. पारधी हत्याकांडात मारले गेलेले मागासवर्गीय हे भारतीय पोलिसांच्या कडून नाही तर परंपरागत भारतीय मनुस्मृतीच्या क्षत्रिय सेवेमुळे, हे देखील नम्रपणे कबूल केले पाहिजे. सरकारी पोलीस खात्याने कोरोनाच्या काळात प्राणही गमावलेत अनेक ठिकाणी त्यांनी लोकांना मदतही केलीय. मी त्यांना धन्यवाद देऊन हे सांगेन भारतातल्या मागास जॉर्ज फ्लॉईडला तुम्ही कधी मारू नकाच, परन्तु कोणी स्वयंघोषित पोलीस बनून (क्षत्रिय) अवतार घेऊन मारत असेल तर निष्क्रिय होऊ नका हे संविधानाचे तत्व आम्हास जगायचंय. 
     सामाजिक शोषणात धार्मिक आधार घेऊन अत्याचार करण्यात मनुवादी भारत कुप्रसिद्ध आहे. येथील भूमीपुत्रानी आपल्यावरील अन्याया विरोधात बोलू नये, लिहू नये म्हणून त्यास मनूने शिक्षणच नाकारले होते. ते सावित्रीमाई फुले यांनी दिले. तो तहानेने व्याकुळ झाला तरी पाणी उच्चवर्णीयांनी नाकारले होते; ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आरक्षण शिक्षण नाकारले ते राजर्षी शाहू महाराज यांनी दिले. मागासवर्गीय भूमिपुत्र यांच्या या लढ्यात सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, तेहतीस कोटी देवही नाहीत त्यामुळं बहुसंख्य लोक मागासांच्या बाजूने नाहीत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे लढणारे एकटे पडले, दुर्मिळ झाले. विचार मात्र संपले नाहीत, चक्क अमेरिकेतूनही पुढे येऊ लागले. सुरुवातीस बोटीचा प्रवास नंतर विमानाचा आणि आता सोशल मीडियाच्या मनाचा वेग साऱ्या शोषितांना जगाबरोबर क्षणात जोडत आहे. 
     कोरोनाच्या नावे वरळी कोळीवाड्यातील भूमिपुत्र आगरी कोळ्यांना बदनाम करताच तेथील मातृसत्ताक महिला विजेसारख्या कडाडल्या.त्याने आदित्यही ढगाआड गेला. मासेमारीस गेलेल्या ओल्याचिंब भगिनींना उठाबशा काढायला लावणाऱ्या, अपमानित करणाऱ्या पोलिसांना जयेश आकरे या तरुणाने समाज जागवून वठणीवर आणले. एकंदरीत उच्चवर्णीयांच्या सर्व प्रकारच्या शेतीस ऊस कारखान्यास प्रोत्साहन देणाऱ्या सरकारने कोकणातील मासेमारी कोरोनाच्या काळात उध्वस्त केली आहे. कोळीवाडा गावठाणात जमिनी लुटून मस्त झालेले भूमाफिया बिल्डर युतीने आता भूमिपुत्रांना जमिनीचा सातबारा शिल्लकच ठेवला नाही. त्यामुळे मोदींचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज भूमिपुत्रांना मिळणे अशक्य आहे. जेवण सुरू आहे आणि ताट वाटी च नाही, उद्योग व्यवसाया साठी आवश्यक जमिनी विना भूमीपुत्राची ही केविलवाणी अवस्था झालीय.    
    जगभरच्या शोषितांना आपल्या संविधानिक हक्कांसाठी जागविणारी अमेरिकन आंदोलनाची आग आता भर वादळात अरबी समुद्राच्या उसळलेल्या लाटांना लागलीय, समुद्रही पेटलाय!! आगरी कोळी कोरोनाच्या या बंदिवासात बोलू लागलाय. नवी मुबंई विमानताळात आगरी कोळी कराडी तरुण रुपेश धुमाळ, गौरव म्हात्रे, किरण केणी, प्रेम पाटील, किरण पवार, राज पाटील, डाऊर सर यांच्या तरुण नेतृत्वाखाली लढतोय. रायगड ठाणे नवी मुबंई, मुंबई येथे विविध पक्षात आगरी कोळी ओबीसी राजकीय नेते असूनही अत्याचार वाढतच होते. महाराष्ट्राच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षात ओबीसी नेत्यांनी गुलामी स्वीकारल्यामुळे भूमीपुत्राचा आवाज दाबण्यात आला. मच्छिमार प्रकल्पग्रस्त पुनर्वसना पासून वंचित राहिले परन्तु ठेकेदार नेते मात्र शेठ होऊन बसले. नवी मुबंई च्या गावठाण चळवळीने तरुणाईमध्ये नवं चैतन्य भरले. आज ठाणे रायगड मुंबई या ओबीसी पट्ट्यात ओबीसी तरुण सामाजिक स्तरावर संघटित झाल्यामुळे लोकांचे लक्ष उच्चवर्णीयांचे गुलाम झालेल्या राजकीय नेतृत्वास बाजूला सारून समाजाच्या कामात पुढाकार घेत आहेत ही आशेची गोष्ट आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक प्रश्नाबाबत मुका असलेला सागरपुत्र आता बोलू लागला. कोरोनाच्या काळातही भूमिपुत्र स्पीकस च्या सोशल मीडियावरील चर्चेने आता लढाईचे रणशिंग फुंकले गेले. राबोडी कोळीवाडा ठाणे येथील उच्चशिक्षित मनीष चंद्रकांत वैती आणि वेसावे कोळीवाडा येथील उद्योजक विकास मोतीराम कोळी यांनी विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाची महाचर्चा घडवून आणली. यात डॉ शेखर ओझा, डॉ अजय नाखवा, श्रीमती तेजस्विनी गलांडे, राजहंस टपके, डॉ हर्षदीप कांबळे, सदानंद पवार  सहभागी झाले.
       सर्व समाजाच्या भलेपणाचा विचार करणारा बुद्धिमान वर्ग शोषितांना मागासवर्गीयांना जास्त गरजेचा असतो. भारतात सर्वच क्षेत्रात प्रगतीची नवं नवी शिखरे गाठणार-या बौद्ध बांधवांनी हे सिद्ध केलेले सत्य आहे. अर्थात जागतिक कीर्तीच्या विद्वान असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने हे बदल घडलेत. जागतिक स्तरावर स्वतंत्र बुद्धीच्या बळावर अनेक समाज आणि राष्ट्र यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारतातील उच्चवर्णीय लोकांनी मागासवर्गीय बांधवांना ज्ञान शिक्षण आणि नव्या  संधी नाकारून प्रकाशाची दारे आणि खिडक्या ही बंद केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान आर्थिक सामाजिक राजकीय समतेच्या तत्वामुळे जे नवं नवे अधिकार मागासवर्गीय भारताला देत आहे तेही काढून घेणारे मोदींसारखे राज्यकर्ते पुन्हा मनुस्मृतीकडे देशाला नेत आहेत. अशातच एकत्र येऊन उद्योग विकासाच्या ज्ञानाची चर्चा घडविणारे ओबीसी तरुण ही नव्या भारताची आशा आहे. गुलामीचा धर्म सांगून तर्क बुद्धीचे मार्ग बंद करणारी देव देवळे यांना कुलपे लागली आहेत. देवळातील पैसा माणसाच्या उपयोगात येत नाही हे पाहून निराश माणसे स्वतःच्या बुद्धीचे बंद दरवाजे स्वतःच उघडीत आहेत!  हे जग परिवर्तनशील आहे हे सांगणाऱ्या मातृसत्ताक एकविरा पुत्र बुद्धाचे  युग येणार हे तर सांगत नाहीत? 

राजाराम पाटील, 8928452112,उरण रायगड
ओबीसी संघर्ष समन्वय समिती.महाराष्ट्र.

कोरोना,अयोध्या आणि ओबीसी.

 कोरोना,अयोध्या आणि ओबीसी. 

   वादग्रस्त बाबरी मशीद ढाचा आणि राम मंदिर वाद 11 मे 2020 पासून संपून, सत्याकडे अर्थात मूळ बुद्ध भूमीकडे वाटचाल करीत आहे. या देशातील लोकसंख्येच्या 52 टक्के ओबीसी बांधवांच्या उत्कर्षासाठी आलेल्या मंडल आयोगाला गाडण्यासाठी जे राम जन्म भूमी आंदोलन उभे करण्यात, त्यात उच्च वर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यशस्वी झाले; ते अयोध्येच्या रामाचे अस्तित्व आज भारतीय पुरात्वीय विभागाच्या वास्तुरुप पुराव्यानिशी संपले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी लढलेल्या, त्यासाठी स्वतःस उध्वस्त करून घेतलेल्या, प्रचंड त्यागाचा आदर्श देणाऱ्या, ज्ञात अज्ञात आंबेडकरी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.या आंबेडकरी बौद्ध आणि ओबीसी कार्यकर्त्यांत जनार्दन पाटील, जगन्नाथ कोठेकर, दि बा पाटील या आगरी समजातील कार्यकर्त्यांची आठवण करावी लागेल. कारण त्यांनी मंडल आयोगाची लढाई अयोध्येचा राम नाकारून लढली होती. 
       आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्वच आगरी कोळी कराडी भंडारी माळी ओबीसी कार्यकर्त्यांच्या अंगावर राम नाकारल्यामुळे अंगावर शहारे येऊ शकतात! स्वातंत्र्यानंतर  टिळक नेहरू गांधी या कॉंग्रेसच्या चळवळीस जी सत्ता मिळाली त्यात अयोध्येचा राम हा अविभाज्य भाग होता. कॉग्रेसच्या या रामाला अर्थात वैश्य "महात्मा गांधींना" गोळ्या घालूनच, ब्राह्मण नथु रामाने  सावरकर गोळवलकर ते अटलजी प्रमोद महाजन आणि आताची मोदिसत्ता आणली!. ही सुद्धा रामाच्या आणि राम मंदिराच्या नावानेच ना?.. राम जन्म ते रामायण, कृष्ण जन्म ते महाभारत याची चिकित्सा फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 
      भारतीय लोकांच्या खास करून ओबीसींच्या मनावर राज्य करणारे दशावतारातील  राम कृष्ण, यांच्याबाबत जागतिक स्तरावर ऐतिहासिक, पुरातत्वीय पुरावे सापडत नाहीत. जागतिक इतिहासाचा अभ्यास केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच राम कृष्ण, या घरा घरात आजही विराजमान झालेल्या या महादेवांची परखड चिकित्सा केलीय. कोरोनाच्या तिसऱ्या जागतिक महायुद्धात, परदेशी शिष्यवृत्तीसाठी क्रीमीलेयर लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या धनुर्धारी धनंजय(अर्जुन) मुंडे सरकारवर तुटून पडणारे संविधान रक्षक बौद्ध बांधव आम्ही या लाॅकडाऊन मध्ये पाहिले! इंग्लड अमेरिकेच्या शिक्षणात गुलामी नष्ट करण्याची ताकद आहे. म्हणूनच ते वाघिणीचे दूध आहे. भारतीय इंग्रजी माध्यमात ते नाही; हे सत्य  बाबसाहेब आंबेडकरांच्या  जगात दुम दुमणा-या मानवी  डरकाळी मुळे सारेजण जाणतात.
       बौद्ध काळातील नालंदा तक्षशिला सारख्या जगद्विख्यात विद्यापीठातील, दैववादाच्या पलीकडे मानवी तर्क बुद्धीस घेऊन जाणाऱ्या शिक्षणाची वाट मनुस्मृतीच्या दैववादी विचारसरणीने लावली. स्वदेशीच्या आग्रहासाठी लढणाऱ्या वर्तमान राजीव दीक्षित सारख्या भारतीयांना, खऱ्या गुलामीचे समर्थन करावयाचे असते. म्हणूनच स्वदेशी वस्तू आणि मनुवादी शिक्षणाचेही ते सहज समर्थन करतात. ओबीसी समाजाने आज कॉंग्रेसी खादी आणि भाजपायी मोदी यात ओबीसींचा सर्वनाश आहे, हे ओळखून आजतरी ओबीसी समाजातील किमान 2000 मुले मुली परदेशात सरकारी खर्चाने पाठविण्याचे  वंचितांचे राजकारण केलेच पाहिजे!  मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसींना याबत नेहमीच धन्यवाद देईन. 
        आजपर्यंत बॅरिस्टर गांधी आणि बॅरिस्टर सावरकर यांनी ओबीसींना आवश्यक असलेला विदेशातील बुद्धीवाद, तर्कशुद्ध विचार, मानवतावाद देशात सांगितला नाही. कारण त्यांना या देशातील मनुस्मृती प्रणित  व्यवस्थेचे लाभधारक असलेल्या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या जन्मदात्या स्वजातींशी पंगा घेणे जमले नाही. हा त्यांचा ऐतिहासिक पराभव नोंदवावाच लागेल.
       लोकानुनय करून सत्ता संपादन करणे ही भारतीय राज्यकर्त्यांची फार जुनी घाणेरडी सवय आहे. त्यात वर्तमानातील सारे उजवे डावे पक्ष आणि धर्म संप्रदाय आणि बुद्ध विचारांना नाकारणारे विचारवन्त सहभागी आहेत. समाजाला जीवन धारणेसाठी आवश्यक, परन्तु कटू असलेले सत्य निर्भीडपणे सांगतो तोच खरा 'नेता'. तो पराभवाची काळजी कधीच करीत नाही. ही नेतृत्वाची व्याख्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि जगूनही दाखविली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राजकारण करणाऱ्या पक्षांना भारतात जे अपयश आलेय, त्यास राम आणि कृष्णाना मानणाऱ्या ओबीसी मतदारांचा वाटा मोठा आहे.  आंबेडकरी राजकीय सामाजिक नेतृत्वाने यामुळे निराश होऊ नये. अशी घटना अयोध्येत घडली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी 11 मे रोजी सपाटी करण्याचे, मंदिरासाठी पाया घालण्याचे काम अयोध्येत सुरू आहे. 21 मे रोजी बौद्ध वास्तू आणि मूर्तीचे अवशेष समोर येतात याचा अर्थ मागील दहा दिवसांत बरेच पुरावे नष्ट झालेत! "मोदी है तो मुमकीन है।"  हे साऱ्या भारतीयांना कोरोनामुळे उमजून आलेले सत्य आहे.  "हे राम" असे शेवटचे उद्गार, मृत्यूच्या दारात कोसळताना काढणाऱ्या राष्ट्रपित्याची राम निष्ठा निदान संघवाल्यानी कधीच विचारू नये! 'ईश्वर अल्ला तेरो नाम' झालेल्या गांधींना बुद्ध दिसला नसला तरी राम हा त्यांचा आतला आवाज होता. अगदी आजही हृदयात राम जपणाऱ्या चिरंजीव मारुती आणि रामनिष्ठ ओबीसी पेक्षाही प्रामाणिक गांधीजी सारख्या,अहिँसक महापुरुषांचा वध करणारा ब्राह्मण आतंकवादी नथुराम गोडसे आहे! त्यामुळेच सत्ताधारी संघ परिवारास राम हा आदर्श प्रत्यक्षात जगायचा नाही! हे प्रमोद महाजन आणि त्यांच्या बंधुप्रेमातून आलेल्या मृत्यूने, जगासमोर आलेलं सत्य तुम्ही जाणता? प्रश्न साऱ्या भारतात कथा पुराणातून घरोघरी पोहचलेल्या परन्तु, प्रत्यक्ष इतिहासात, अस्तित्वात नसलेल्या रामाचे नाव घेऊन गांधी आणि गोळवलकर याना सत्ता मिळविता येते. ही जुमलेबाज राजकारण्यांची राजनीती आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेत सांगितलेली "संविधानिक नैतिकता" नाही. 
        भारताची सत्ता मिळविण्यासाठी इंग्रजांना जो सैनिकी युद्धाचा फार मोठा संघर्ष करावा लागला, तो भारतातल्या उच्चवर्णीय लोकांना राम नामाने मिळविलेला अध्यात्मिक विजय होता. आज मोदींच्या या राम मंदिर अडवाणी यात्रेच्या पराक्रमाची, गाथा ऐकूनच ट्रम्प तात्या मोदींचे फॅन झाले असतील. राम कथे इतकाच श्रवणीय भाजपचा सत्ता संघर्ष आहे. भारताच्या नव्या अभ्यासक्रमात तो असणारच अशी लक्षणे दिसतात.रामायण महाभारत लिहिणारे वाल्मिकी आणि व्यास ओबीसींना जेवढे पूजनीय आहेत तेव्हढि लोकप्रियता संविधानकाराच्या वाट्यास आली नाही, याचे मूळ कारण रामायण महाभारत हे लोकांना आवडणारे असत्य कथन महाकाव्य आहे. तर भारतीय संविधान हे जीवनावश्यक परन्तु कटू सत्य आहे.    
       आज अयोध्येत काय सापडले आहे?  तर बौद्ध सत्य इतिहास सांगणारे भौतिक पुरावे! ज्याचा बाबर मुस्लिम आणि राम हिंदू वादासी काडीचाही संबंध नाही. यात बुद्ध मूर्तीचे अवशेष, सम्राट अशोकाच्या बांधणीत नेहमी दिसणारे स्तंभ,पाली भाषेतील शिलालेख!! तसेच ही बुद्ध कालीन साकेत नगरी आहे जेथे महामाया एकविरा पुत्र बुद्ध यांनी तीनवेळा प्रत्यक्ष भेटी दिल्याचे विदेशी प्रवासी इतिहासकार सांगतात. 
      भारताच्या अर्वाचीन इतिहासात हिंदू मुस्लिम सत्ताधारी  लोकांनी, लाखो निष्पाप लोकांचे बळी घेऊन आजची सत्ता मिळविल्या मुळे, खऱ्या "सत्या" पेक्षा राजकीय सत्ताच महत्वाची आहे. तरीही भारतात नेहमी सत्याचाच विजय होतो. म्हणूनच आमच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आम्ही स्वीकारलेय. त्याचा याची देही याची डोळा, कोरोनाच्या या युद्धात याचा येणारा  प्रत्यय म्हणजे अयोध्येत सापडलेले बौद्ध अवशेष होय. 
        भारताला बुद्धाच्या देशा पर्यंत 2500 वर्षे जुन्या काळात घेऊन जाण्याचे  ऐतिहासिक कार्य सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी केलेय.  ते पहिल्या भारतीय पुरातत्व खात्याचे पाहिले महा निदेशक होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1814 साली झाला. 1834 ते 35 या कालखंडात त्यांनी सारनाथ येथे बौद्ध स्तुपाचे उत्खनन केले. हे पहिले भारतीय उत्खनन होय. देशाचा सातबारा बदलण्यात माहिर, उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जमिनी खालचा इतिहास बदलू शकले नाहीत. 2000 वर्षांपूर्वी सारा देशच बुद्ध आणि बौद्ध सम्राट अशोकाच्या साम्राज्यात बौद्धमय होता. अर्थात आज जमिनीखाली बुद्ध आणि बुद्धच आहे. आज राम कृष्ण आणि बुद्ध या बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धांना आघात करून कुणाचेही मन, भावना दुखावण्याचा या लेखाचा हेतू नाही. मी देव, ईश्वर नाही, स्वर्ग, चमत्कार, नवस, आत्मा,  पूजा, चमत्कार, नशीब मानीत नाही, मी कुणाचा गुरू प्रेषित नाही हे सांगणारा बुद्ध हेही सांगतो की एखादी गोष्ट धर्मग्रंथ, धर्मगुरू, परंपरा सांगतेय म्हणून स्वीकारू नका तर तुमची इंद्रिये आणि सद्सद्विवेक बुद्धी आणि लोकांचे कल्याण यांना अनुकूल आहे म्हणून स्वीकारा कालाम सुत्तामध्ये  हा बुद्ध संदेश विस्ताराने पहाता येईल. अर्थात ओबीसींना आज माहीत नाही. आज खरी गरज असताना देव देवतांच्या चमत्कारी मंदिरांना टाळे लागलेय! मंदिरातील अब्जावधी रुपये मंदिराच्या पुजाऱ्याच्या तिजोरीत आहेत. लोक मरताहेत पुजारी पैसे सोडत नाहीत.
         आता रामाच्या नावे अयोध्येला पुन्हा एक मंदिर बांधून पैसे सांभाळायला पुन्हा 100 टक्के उच्चवर्णीयच येणार. ओबीसी कदापि नाही. कोरोनाच्या काळात मैदान सोडलेल्या देवांना पुन्हा आणण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. या जगात देव, स्वर्ग चमत्कार नाही हे सांगणारा बुद्धच सत्य आहे. कोरोनाच्या काळात खूप चांगल्या घटना निसर्गात घडताहेत. कोरोना लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वी 29 दिवस सलगपणे मी केरुमाता बौद्ध लेणी बचावासाठी आंदोलन केले होते. आयोध्येप्रमाणेच जागतिक पुरावे असूनही सिडको नवी मुबंई विमानतळासाठी ही बौद्ध लेणी उध्वस्त करतेय. ही लेणी आगरी कोळी कराडी सागरपुत्र समाजाने बांधली. ती आमच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि सागरी आरमारी परंपरेची स्मृती आहे. आमची दहा गावे आणि हजारो मच्छिमार यांना लिखित पुरावे नाहीत म्हणून पुनर्वसन नाकारणारे केंद्र आणि महाराष्ट्राचे शासन हे दोन्ही येथल्या मागासवर्गीय ओबीसी समाजाचे आणि मातृसत्ताक एकविरापुत्र बुद्धाचेही विरोधक आहेत, हे मला कळले आहे. आज शहरे सोडून रस्त्यावर पायी चालणारा कामगार, मजूर हे भारतीय ओबीसी वंचित उपेक्षित सत्यच आहेजरी रिझर्व बँकेत त्यांच्या नावे धनादेश लिहिणारी सीता रामन आमच्याकडे नसली तरीही.. आकाशातल्या स्वर्गाकडे आत्मनिर्भर होण्यासाठी बोट दाखविणाऱ्या शेटजी भटजिनो कष्टकरी स्त्रिया ओबीसी एससी एसटी मागासवर्गीय भारतच देश घडवितो हे जमिनीखाली आणि जमिनीवर आकाशात कुठेही जा..! सत्य श्रमण भारताचे, कष्टक-यांचेच आहे. दुसऱ्याच्या कष्टावर जगणारे, शरीराची प्राण प्रतिकार शक्ती गमावून, एक दिवशी फुगलेले देह, फुगलेल्या अर्थव्यवस्थेसह मातीतच गाडले जातील! परन्तु जगाला सांगण्यासारखी अस्सल भारतीय जीवनमूल्ये अहिंसा, मानवता, करुणा, प्रज्ञा शील, समाधी या सद्गुणांची कमलपुष्पे बुद्धासारखीच,सम्राट अशोकासारखीच कोरून ठेवा!. 
        ओबीसींच्या नेत्यांनी जागे व्हावे "मुक्ती कोण पथे" हे भारतास सांगणारा संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्या साठी संघर्ष करा ही हाक देतोय!. कारण असत्याने आता आयोध्याच नाही तर प्रत्येक मागासवर्गीय भारतीयाला घेरले आहे.. कोरोना असेच एक मानवनिर्मित जागतिक भय आहे! जे रामरक्षेने नाही तर बुद्धाच्या विवेकबुद्धीने प्रज्ञेने नाहीसे करता येते..! मी केलेय!तुम्हीही करा!!. हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक एकविरा संस्कृतीचा विजय व्होवो!!!*  

  राजाराम पाटील 8928452112,उरण,रायगड
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र.

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.

 हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.

अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी मारहाणी विरोधात व्हाईट हाऊस घेरले जाते. सर्व काळे गोरे शिस्तबद्ध,शांतपणे जनआंदोलन करून पोलिसांना गुदगे टेकायला लावते. हे सुशिक्षित पणाचे लक्षण आहे. 
भारतातील केरल राज्य हे शिक्षणात एक नंबर वर आहे.त्या राज्यात एका मुक्या प्राण्यावर हत्तीनीवर अननस मध्ये स्पोटक फटके भरून खाण्यासाठी दिले ही घटना मानव जातीला कलंक लावणारी ठरत आहे.कोरोना संकटाला समर्थपणे तोंड दिल्यामुळे केरलाचे नांव गौरण्यात येत असतांना ही हत्तीणीची घटना केरला राज्याच्या शिक्षण आणि मानसिकतेला कलंकित करणारी आहे.
भारतात लाॅकडाऊन काळात अनेक असंघटित गरिब कामगार,मजदूर त्यांची मुलमुली रस्त्यावर जाती व्यवस्थेमुळे भूकबळी ठरवून मारल्या गेली. अनेक गरोदर महीला रस्त्यावरुन हजारो मैल चालत गेल्या काही प्रसुत झाल्या. हे सगळ सुरु असतांना भारतातील अक्षर ओळख असलेले लोक,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे (सुशिक्षित म्हणता येणार नाही.) स्वत:च्या घरातील पाककला. टिकटाॅक चे विडीओ,
"नथीचा नखरा,केसातील गजरा" सारख्या थिल्लरपणात मग्न होते. ज्यांनी या असह्य मजदूरांना अन्नाची पाकिटे देऊन मदत केली त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आणि अभिनंदन.त्यांची इतिहासात नोंद होणार आहे. बहुसंख्य माणसांची मानसिकता अमेरिका आणि भारत यातील फरक आहे.
अमेरिकेतील सुशिक्षित स्वतंत्र मानसिकता आणि भारतातील अक्षर ओळखीची गुलामी मानसिकता.निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडूनकुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही.कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण स्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर जात फक्त माणसाची असतेत्याला हत्तीच्या जीवाचं काय पडलय ?.
नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटो बाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने "माफ कर बहिणी" म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली.
सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. कोणताही प्राणी हिंस झाला तर शांत राहत नाही.कुत्रा असो की हत्ती तो पिसाटतो पण या हत्तीणीने या ही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाहीकुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली.
शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने पाण्याबाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले. तिला वाट दाखवण्या करता, पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली. दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण  च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्भवती होती.
मोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला. माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता. तिला त्यांच्यावर माणसावर विश्वास ठेवावा वाटला नाही. तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.
माणसाला माहित आहे त्यांचे बाळ बाहेर येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात.  पण कोणत्या प्राण्याच्या बाळाला बाहेर येण्यासाठी किती महिने लागतात याची माहिती आहे काय?. वीस महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या?. तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती?वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती?. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर संध्याकाळी सात नंतर दरवाजे बंद होत होते.तेव्हा बाराशे फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाही तर प्राण्यांतील.
एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं त्या माणसाने?. ते कृत्य एका कोणी माणसांने केले.पण अख्खी मानव जात बदनाम करून गेली.मागासवर्गीय आदिवासी,अल्पसंख्याक आणि भटक्या जाती जमातीचे निर्दयपणे खून होतात तेव्हा ही कोणत्याही माणसांच्या जातीला दुख होत नाही.तेव्हा संपूर्ण गांव खून करणाऱ्या माणसाच्या जातीच्या पाठी मागे उभे राहते.खैरलांजी,जवखेडा,खेर्डा,सोनाई,राहता असे एक नाही हजारो उदाहरण राज्यात देशात घडली आहेत.त्यावर अमेरिके सारखे सर्व लोक एकत्र येवून निषेध करीत नाही.येवढा फरक आहे अमेरिका आणि भारतात.
धर्माचा पगडा संस्कार लहानपणा पासून माणसाच्या जातीवर केलेले असतात.धर्माने कि अधर्माने,स्वर्ग कि नरक,पाप कि पुण्य हे मापदंडाच्या कसोट्या कोरोना,चक्रीवादळ,आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल असे सांगणारे देवाच्या मंदिरातून बाहेर पडून आज बेरोजगार होऊन बसले आहेत. नाही तर त्यांनी यज्ञ,होमाचा झपाटा लावला असता.
 कोरोना पॉजीटीव रुग्ण,चक्रीवादळामुळे घराचे शेतीचे नुकसान झालेला मजदूर आणि शेतकरी यांचा विचार करीत असतांनाच नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो.डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं.
माणसाला न्याय देतांना माणसाची जात आडवी येते. एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित मनुवादी हिंदुत्व मानणाऱ्या माणसाच्या जातीव्यवस्था वर्णव्यवस्था न्यायालयात होणार नाही.पण भारतीय संविधान मानणाऱ्या माणसाच्या न्यायालयात न्याय जरूर मिळेल.आसाराम,राम रहीम सारख्यांना शिक्षा देण्यास भाग पडणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई 
Attachments area