Saturday, November 7, 2015

इंदू मिल स्मारकाचा शिल्पकार कोण ?.


    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक किर्तीचे स्मारक बनावे या करिता काही राजकीय नेते आपल्या चेल्या चापटयांना घेऊन आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचे काम करीत होते.त्या मागचा प्रामाणिकपणा किती आणि राजकारण किती हा मुख्य संशोधनाचा माझा विषय आहे.डॉ बाबासाहेबाचे विचार हे नेहमी क्रांतिकारी असत.समाज सेवा करण्या करिता त्यांनी कधीच काम केले नाही आणि करू दिले नाही समाज परिवर्तन हाच त्याचा मुख्य उदेश असायचा.आज आंबेडकरी चळवळ राजकारणाच्या गटातटात विभागली असल्या मुळे त्याच्या समाज परिवर्तनाच्या लढाईची धार बोथड झाल्याची काहीना वाटते.स्वार्था करिता काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाचा सौदा करून आमदारकी खासदारकी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात.तर काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाच्या मुलभूत समस्या वर न बोलता न लढता बहुजनाचे भावनिकदृष्ट्या नेते बनतात. त्यात ते अयशस्वी झाले कि सत्यापासून लांब पाळतात.ज्या समाजात आपल्याला राहायचे आहे. त्याच समाजाचे नेते म्हणून मिरवायचे आहे.त्याच समाजाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर न लढता केवळ राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून काम करणे म्हणजे आंबेडकरी क्रांतीकारी विचार आणि चळवळ नाही.माफ करा वाचका नो आणि भक्तानो १९२७ ते १९३६ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई असंघटीत कष्टकरी शेतमजूर यांच्या स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याची होती.त्यामुळेच हा असुशिक्षित अज्ञानी असंघटीत कष्टकरी शेतमजूर चळवळीत हिरीरीने भाग घेत होता.तोच समाज आज खेडे सोडून शहरात आला.आणि असंघटीत बांधकाम कामगार झाला.खेड्यातील सालदारी गावकी, महारकी करणारा अल्प भूधारक शेतमजूर झाला.तोच या देशातील सर्वात मोठा मतदार आहे.आंबेडकरी चळवळी तील किती नेते या असंघटीत कामगार मजुरांना संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारा करिता लढतात.इंदुमील करिता जीवाचे रण करणारया नेत्यांना हे माहित आहे काय?.
इंदुमिल स्मारक शिल्पकार कोण? 
इंदुमिल स्मारक शिल्पकार.भाजपच ठरणार आहे.कारण ते सत्ताधारी आहेत त्याचे नांव आणि कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहल्या जाणार आहे .त्याचा राजकीय लाभ ते अनेक वर्ष घेणार आहेत.आंबेडकरी चळवळी तील गल्लीबोळातील नेत्यांना किंवा स्वयम घोषित संस्थापक राष्टीय अध्यक्ष यांना आणि समाजाला मिळणार नाही या पुढे स्मारकाच्या वेगवेगळ्या समितीच्या सभासद पदा करिता त्यांना संघर्ष करण्याचा अधिकार ही त्यांना राहणार नाही. तुमच्या जागी तुमच्या समाजातील अन्य नेते जे भाजपच्या जनसंघटना,पक्षा मध्ये किर्याशील आहेत त्याची वर्णी लागेल.हे जागृत समाज बांधवानी विसरू नये.कामाची सुरवात झाली नाही तर बाबासाहेबाचा पुतळा किती उंच असेल?. एक हात वर एक हात मागे कि एक हात वर एका हातात संविधान ?.भव्य गार्डन कि स्मारक काहीच स्पष्टीकरण नाही.आंदोलन करणारे नेते दररोज एक चुक पुढे करून सरकारला धमकी आणि इशारा देत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार मानणारा समाज संविधानच मानत नाही असे म्हटल्यास काही भक्तांना राग येणे स्वाभाविक आहे.म्हणून मी फक्त इथे इंदुमील स्मारक आणि सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलना बाबत काही लक्षवेधी घटना कडे लक्ष वेधू इच्छितो. सत्ताधारी राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्या शिवाय काही आंदोलन यशस्वी होत नाहीत.अन्यता प्रसिद्ध कामगार नेते विजय कांबळे शरद पवार साहेबाचा आशीर्वाद घेऊन कधीच इंदुमिलचे शिल्पकार झाले असते.
  6 डिसेंबर 2011 ला आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचा ताबा घेतला कसा घेतला. आणि हा ताबा जवळ जवळ 18-19 दिवस कसा राहिला होता. सहा डिसेंबर हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वाण दिन म्हणून देशा विदेशातील लोक ३ डिसेंबर पासून दादरच्या चेत्यभूमी ला मानवंदना देण्या करिता दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक येतात.नेमखे पाच आणि सहा तारखेला कोणत्याही गल्लीबोळातील नेत्याने या दिवशी जनआंदोलन केल्यास त्याला आणि त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पकडून जेल मध्ये टाकु शकतात पण त्याला नेत्याला अटक केल्यास आंदोलन चिगळून हिंसाचार,जाळपोळ होऊन निरपराध माणसाचा बळी जाऊ शकतो.(भारतीय सविधाना नुसार) ५ व ६ डिसेंबर २०११ ला असे आनंदराज आंबेडकर यांच्या आंदोलनकर्त्या सोबत पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर काय घडले असते?. याचा विचार करताच अंगावर काटा उभा राहतो.चेंगराचेंगरीत किती लोक घायाळ झाले असते?.कितीचा बळी गेला असता?.त्यातून एकाच वेळी आठवले साहेब,कवाडे सर,बाळासाहेब इतर नेते संपविण्या साठी सर्व कॉंग्रेस प्रणीत मिडिया काम करीत होती. त्यातून एकमेव नेते म्हणून आनंदराज राष्टीय नेते झाले असते त्यासाठी कॉंग्रेसने मुंबई ते दिल्ली पायघड्या टाकल्या होत्या.त्याला शरदचंद्र पवार साहेबांनी कसा सुरुंग लावला याचे वर्णन त्याकाळचे मान्यता प्राप्त वर्तमान पत्र तपासून पहा.समाजावर होणारया अन्याय अत्याचाराच्या लक्षवेधी घटना असताना त्यावर संघशक्ती निर्माण करून इतर नेत्या पेक्षा वेगळे अस्तीस्व निर्माण करणारा नेता समाज परिवर्तनाची योजना घेऊन समाजात जातो.तो खरा नेता असतो.कोणती हि योजना नसताना नेता बाण्याचा हा शॉटकट सध्या आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण करीत आहे.यावर बोलणे आणि लिहणे म्हणजे जीवाची बाजी लावणे आहे.
इंदुमील चे जागतिक किर्तीचे स्मारक कसे बनेल ?. या सरकारने जागतिक कीर्तीच्या वास्तू विशारद कडून गोबल टेंडर मागविले पाहिजे होते.तसे न करता चेत्यभूमी विकास आरखडा ज्या शशी प्रभूनी बनविला त्याला सर्व पक्षीय नेत्यांनी आणि जाणकारांनी प्रचंड विरोध केला.त्यालाच इंदुमील स्मारक करिता वास्तू विशारद म्हणून नेमणूक केली.म्हणून या सरकारची पुढील रणनीती,आराखडा काय असेल याची कल्पना करण्यास हरकत नाही.कॉंग्रेस सारखे भिजत घोगळ ते ठेवणार नाहीत त्यांना जे हवे ते लवकर पूर्ण करतील. आणि देशातील दलित बहुजन समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार जो एक वर्ग आहे.त्याचे समर्थन मिळवतील.दलित बोद्ध इतर सर्व मागासवर्गीय जाती जमातीला ते पक्ष संघटनेत प्राधान्य देऊन आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी विचाराचे समर्थन करणाऱ्यांची गोची करतील.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर आणि इंदुमील स्मारक यांचे ते शिल्पकार ठरले आहेत..त्याला दिशाहीन झालेला बोद्ध समाज आणि राजकीय स्वार्थाने पछाडलेले नेते जबाबदर आहेत.यावर एकच उपाय असंघटीत कामगार असलेल्या समाजानी संघटितपणे सुशिक्षित,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना बाहेर कडून राजकीय गटबाजी संपवण्यासाठी विभागा विभागात बैठका घेऊन एक पक्ष,एक नेता,एक उमेदवार निवडणे.स्वतचे मतदार संघ तयार करून निवडणूक लढविणे.मग बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारता येईल.साडेबारा एकर साठी ज्या नेत्यानी जो संघर्ष केला तोच स्वताचे मतदार संघ बांधण्या साठी केला असता तर आज चित्र वेगळे असते.उतर प्रदेशात मायावतीने १२०० एकर भूमी वर महापुरुषाचे भव्य स्मारक बनविले.त्या करिता किती जनआंदोलन करावा लागला?.इतिहास वाचा.बाबासाहेबांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून सतत गौरवने सोपी आहे.त्याची अंमलबजावणी करणे सोपी नाही म्हणून आम्ही शासन करती जमात न बनता आंदोलन करणारी जमात बनत राहिलो.आता हे थांबविले पाहिजे दहावीस वर्षांनी तरून मुलांनी आपल्या वडीलधारयांना विचारले कि इंदुमील स्मारकाचे शिल्पकार कोण त्यांच्या जवळ कोणते उतर असेल?.समाजातील थोर विचारवंत,साहित्यिक,शोध पत्रकारिता करणारे पत्रकार काय इतिहास लिहून ठेवतील ?.कोणत्या बाबत आपले एकमत होते आणि आहे.आमचे आईवडील आजोबा असुशिक्षित अज्ञानी होते तरी ते आंबेडकरी चळवळीच्या मागे उभे राहिले म्हणून मी आज मान्यताप्राप्त नेत्याच्या विरोधात लिहू व बोलू शकतो.आजची युवा पिढी जिथे गूढ खोबर,आणि होडींगवर फोटो,बिर्याणी बियर,रम होडका मिळेल तिथे आपली शक्ती खर्च करताना दिसते.त्याचा एकाही  नेत्यावर विश्वास राहिला नाही.त्यांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे ते आव्हान कोणी स्विकारण्यास तयार नाही सर्व शॉटकट स्वीकारतात मग चळवळी चे होणार काय ?. 

कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई !.

कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई !.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ २००७ ला पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला.देशातील पहिली दलित महिला देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे.उतर भारतात कांशीराम यांनी जी समाज प्रबोधनाची मोहीम राबविली त्यामुळेच कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई असा नारा दिल्या जातो.
  महापुरुषाची विचारधारा सांगणारी जी बसपा देशातील बहुजन समाजाला जागृत करून सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!." ती बसपा २०१२ च्या विधान सभा निवडणुकीत चारीमुंड्यचीत झाली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उरलीसुरली प्रतिष्ठा मातीमोल झाली.त्यामुळे देशातील दलित समाज आपल्या १९३२ च्या परिस्थितीत होता तिथे येऊन थांबला.ज्या चातुर्वर्ण्य,मानुवादाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात.आणि त्याचा वापर समाजाला तोडणारया हत्यार म्हणून कसा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि सयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे दलित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही.सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे जिल्ह्याला दिली म्हणजे बहुजन समाजात आर्थिक क्रांती झाली नाही.त्यामुळे दलित समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले "जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागेदारी" संपली.जिसका पैसा भारी उतना उसका पद भारी झाली.त्यामुळे घरादाराची परवा न करता बसपा साठी काम करणाऱ्या जीवदानी कॅडर चे मरण झाले.आणि त्यामुळेच चमचा युग काय करू शकते.हे २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले. 
  मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून मान्यवर कांशीराम यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने देणगी,बुद्धी,वेळ आणि पैसा मिळविला त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात हि सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे ते खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले व सायकल मिळवून दिली.तेव्हा ते खूप खुश झाले.मनोहर काटे या कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.
 कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने अशे धाडस केले नाही.कांशीराम यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
  कांशीरामजी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात.आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समजतील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा मान्यवर कांशीराम यांच्या स्मृर्ती दिनी बहुजन समाजाला विसरता येत नाही