Sunday, September 27, 2015

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

   गात शिक्षण देणारया संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट पैसा कमविणे हाच असतो .ह्या सर्व खाजगी कंपन्या झाल्या आहेत.सुजाण नागरिक घडविणे आणि देशाचा विकास करण्याचा उदेश या शिक्षण संस्थाच्या संचालकाचा नाही.विद्यार्थी दसे पासूनच जर विद्यार्थांना प्रवेश घेताना  भष्ट्राचार करून शिक्षण घेत असतील तर पुढे कोणत्याही पदव्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उदेश फक्त पैसा कमविणे हाच असणार आहे.त्यांना देशाच्या विकासाशी कोणते ही देणेघेणे नाही. दिनाक ४ ऑक्टोबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. त्यावेळी १९१९ ला उदिष्ट लक्षवेधी होते. १) शैक्षणिक दुष्ट्या गोरगरीब मागासवर्गीय समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ते वाढविण्यास मदत करणे.२)मागासलेल्या समाजात गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.३) निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत बंधुभाव निर्माण करणे.४) अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.५ )संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.६ ) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.७ ) बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.असे शिक्षण देणारे संस्था संचालक शोधून हि सापडणार नाहीत..रयत शिक्षण संस्था ही भी आज सत्यशोधक महात्मा फुलेच्या वैचारिक वारसदार भाऊराव पाटील यांच्या धेय्य धोरणा नुसार चालत नाही या संस्थेत पूर्ण चातुर्वर्ण आणि गर्वसे कहोचा चा बोलबाला आहे.
    कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म २२ सप्टेंबर १८८७; कुंभोज,जिल्हा कोल्हापूर,महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती.अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता.पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले.याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि इतिहास लिहला गेला.
    मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्या साठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६, इ.स. १९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
   करवीर नगरीत सत्यशोधक  समाजाचे  आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या  संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक  चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर  अण्णा तर  राजर्षी  शाहू  महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात  सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक  समाजाच्या विचाराने भारावलेली  एक पिढी त्यांनी  घडविली. जेव्हा  सातारा जिल्ह्यात सत्यशोधक  समाजाने  लोक  जागृतीसाठी  जलसे काढले  तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी  मागेपुढेही  पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन  घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी  एक खास  संस्था   काढण्याची  कल्पना  मांडली आणि ठराव  रुपाने त्या अधिवेशनात त्यास  मान्यता मिळाली.  अशा रितीने रयत शिक्षण  संस्थेचे बीज सत्यशोधक  समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले.  वृक्षाखाली  गौतम  बुध्‍दांना  ज्ञान  प्राप्त झाले.  बहुजन  हिताय ! बहुजन  सुखाय !! हे गौतम  बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून  संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.
    देशातील  भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे ‘(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.हाच आदर्श मराठा समाजा ने कायम डोळ्या समोर ठेवला असतात तर आज राज्यात मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती.कारण आज राज्यात नव्हे तर देशात शाळा महाविद्यालय जरी मराठा समाजाच्या असल्या तरी त्याची शिक्षण देणारी यंत्रणा भटा ब्राम्हणा च्या हाती आहेत. त्यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय नको आहे.
  महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.हा ऐतिहासिक इतिहास बहुजन समाजातील लोक विशेष मराठा समाजातील तरुण वाचत नाही.म्हणून त्यांना सांगावे वाटते जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडविण्यासाठी झटतो.मागास्वर्गीय समाजाची शिक्षण आणि नोकरीतील प्रगती पाहून त्याचे आरक्षण बंद करण्या करिता नाना प्रकारे जनांदोलन उभारल्या जाते.त्यांनी मागासवर्गीय समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बदल घडविण्या साठी फुले,शाहू,आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एतेहासिक त्याग आणि संघर्ष आहे हे कोणी विसरू नये.म्हणून या खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या २२ सप्टेंबर जयंती होती मुंबईच्या मराठी वृत्तपत्रा नी साधी दाखल कर्मवीर भाऊराव पाटील यांची घेतली नाही.म्हणजे किती मराठी पत्रकार संपादक कोणत्या संताची महापुरुषांची  दाखल घेवावी या बाबत दक्ष आहेत हे दिसून येते हा लेख जयंतीनिमित्त लिहला होता.पण एकाही पेपरने (जनतेचा महानायक सोडून )तो प्रसिद्ध केला नाही म्हणून खंत वाटते.इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्व कमी होत नाही.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार

पुणे करार भ्रम आणि वास्तव


भारत देश स्वत्रंत झाला तेव्हा समतावादी लोकांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच होती.आणि विषमतावादी लोकांची व संघटनाची संख्या खूप मोठी होती.तेव्हा सातासमुद्रापार ब्रिटीश सरकार बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम मागसवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी वैचारिक संघर्ष करीत होते.त्यांनी जगातील विद्वानां समोर भारतातील बहुजन समाजाची सत्य परिस्थिती मांडली  होती.त्यामुळे त्याच्या संघर्षाला यश प्राप्त झाले होते.हा इतिहास वाचून कोणी बदलू पाहत होता.ज्याला हे ऐकणे व वाचणे अशक्य झाले होते.त्यांनी पुण्याच्या जेल मध्ये आमरण उपोषण सुरु केले.त्याचा शेवट २४ सप्टेंबर १९३२ ला पुणे येथे झाला.म्हणून त्याला पुणे करार असे म्हणतात.तो करार एम के गांधी आणि डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्यात झाला.त्याचा धिक्कार खुद बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.पण तडजोड करून.
  बामसेफ,मूलनिवासी,अम्बस,भारत मुक्ती मोर्चा सारख्या काही संघटना,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार आणि आंबेडकरी चळवळ दुषित करण्याचा जीवतोड मेहनत करीत आहे.पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी चळवळी तील लोकांमध्ये जात आहेत. इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर ते भारताला बहुजन समाजाला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेवढाच प्रकारे स्वताच्या स्वार्था साठी लढणाऱ्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे अनेक समाज आंबेडकरी चळवळी पासून दूर जात आहे .गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अनेक व्याख्यान,परिसंवाद,देशभर भाषण देणारे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष समाजाला कोणताही फायदा देऊ शकला नाही.असे चित्र निर्माण करून त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असे यांना पुणे कराराचा धिक्कार करून दाखवून दयाचे असते.पण त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता.
  २४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो.बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर एम के गांधीचा प्रखर विरोध होता त्यामुळे त्या विरोधात गांधीनी  आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती की अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी, मतदानाचे दोनवेळा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व उच्च वर्णीय वर्गीय समाजात प्रचंड चीड त्यावेळी निर्माण झाली होती. ती आज ही अहमदनगर जिल्ह्यातील घटना पाहून दिसते.मग आठवा तेव्हा काय परिस्थिती असेल.पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या कडे खैरलांजी खर्डा जवखेडा,सोनई या भीषण हत्याकांडा बाबत कोणती ही ठोस भूमिका नाही.
   गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार केवळ दोन व्यक्तिचा नव्हता तर समतावादी आणि विषमता वादी समाजातील होता. एकाबाजूला असंघटीत कष्टकरी हात मजुरी करणारा समाज तर दुसरीकडे या सर्व मागासवर्गीय समाजाचे शोषण करून आय्याशी पणे जगणारा समाज होता.त्यातील हा संघर्ष होता.
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता की, अस्पृश्यांना समतेचे सामाजिक व राजकीय हक्क त्यांचा एक निसर्गदत्त अधिकार म्हणून मिळाले पाहिजेत, तर महात्मा गांधी अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे भूतदयावादी दृष्टिकोनातून पाहत होते. बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा एक राजकीय हक्क म्हणूनच मिळाला पाहिजे, असे वाटत होते, तर महात्मा गांधी अस्पृश्यांना हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग मानीत होते. म्हणून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास त्यांनी प्राणांतिक विरोध केला. महात्मा गांधी हे स्वत:स तमाम अस्पृश्यांचे नेते म्हणवीत होते, तर बाबासाहेब गांधीजींचा हा दावा खोडून काढताना आपणच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहोत, हे ठासून सांगत होते.ब्रिटिश सत्तेने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यावर महात्मा गांधींनी येरवडा जेल मध्ये प्राणांतिक उपोषण करताना अशी भूमिका घेतली होती की,अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक अंग असल्यामुळे हिंदूंचे ऐक्य फुटणे आपणास मान्य नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मुस्लिम-शीख व ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे जर देशाचे व समाजाचे ऐक्य धोक्यात येत नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे ते कसे काय धोक्यात येऊ शकते? महात्मा गांधींनी तरीही आमरण उपोषण करून बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यायला भाग पाडले व तत्कालीन विधिमंडळात 148 राखीव जागा तसेच स्पृश्य हिंदूंच्या जागांपैकी मध्यवर्ती विधिमंडळातील 10 टक्के जागा अस्पृश्यांना देण्याचे मान्य करणारा पुणे करार केला. 
   25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या पुणे कराराचा एक राजकीय फायदा असा झाला की, राजकीय पक्षांचे लक्ष अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे वेधले गेले. महात्मा गांधी मंदिर प्रवेशाच्या बाजूचे झाले. शिवाय पुणे करारामुळेच आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत यावर शिक्कामोर्तब झाले होते. बाबासाहेब आंबेडकर पुणे करारावर भाष्य करताना म्हणाले, ‘महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेतच अस्पृश्यांच्या राखीव जागांना मान्यता दिली असती तर गांधीजींवर उपोषणाची पाळी आली नसती.’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘पुणे करार हा अतिपवित्र असा करार मानून तो अस्पृश्य बंधूंनी सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे पाळावा.’ पुणे कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अशी असताना बामसेफ सारख्या काही संघटना पुणे कराराची नादानपणे धिक्कार करीत असतात. धिक्कार करणारांना एवढेही भान राहत नाही की, पुणे करार एकट्या महात्मा गांधींचा नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्या करारावर महात्मा गांधीं बरोबरच बाबासाहेबांचीही स्वाक्षरी आहे. तेव्हा आपण पुणे कराराचा धिक्कार करीत असताना कळत-नकळत बाबासाहेबांना कमी लेखून त्याचा हि धिक्कार करीत नाही ना ?.
  गांधी-आंबेडकर यांच्यात अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर तीव्र संघर्ष झाला हे खरे, पण म्हणून गांधी-आंबेडकर संघर्ष हिंदुत्ववादी संघ परिवारासारखा विखारी नव्हता. बाबासाहेबांनी महात्मा गांधींवर कठोर टीका केली, पण या टीकेचे स्वरूप दृष्टिकोनाची, विचारांची मतभिन्नता असी होती. बाबासाहेबांनी महात्मा गांधींबरोबर पुणे करार करायला नको होता असे आजही ज्यांना वाटते व आततायीपणे जे महाभाग पुणे कराराची होळी करून धिक्कार करतात त्यांनी हेही समजून घेतले पाहिजे की, वाटाघाटीत देवाण घेवाण करावी लागते. महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध जेव्हा प्राणांतिक उपोषणची सुरुवात केली होती तेव्हा देशात स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यांच्यावर अत्यंत प्रक्षोभक आणि विखारी भाषेत टीका होऊ लागली होती. ‘त्या’ उपोषणात समजा, महात्मा गांधींच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर दलित समाजाचे काय झाले असते?. याचा कसलाही सारासार विचार न करता पुणे कराराच्या 83 वर्षांनंतरही आज काही अतिहुशार लोक या करारास विरोध करीत असतील तर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजला नाही असे माझे स्पष्ट मत आहे

  भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्यांचा काहीही दोष नव्हता अशा शिखांचे भीषण हत्याकांड झाली.तसेच नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यावर काही ब्राह्मणांचीही घरे जाळली गेली. महात्मा गांधींशी पुणे करार न करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करून तसेच संकट बाबासाहेबांनी आपल्या समाजावर ओढवून घ्यायला पाहिजे होते काय ?.
  पुणे कराराने सांसदीय संस्थांतील राखीव जागांचे तत्त्व मान्य केले. परिणामी बाबासाहेबांनी घटनेत मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक सोयींची तरतूद करतानाच नोकरयाचे ही आरक्षण मिळवून घेतले, पण आजची खरी अडचण अशी आहे की, सरकार मागासवर्गीयांचा सरकारी सेवेतील अनुशेष भरण्याची टाळाटाळ करते. त्यांची पदोन्नती रोखून धरते. कहर म्हणजे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच खासगी विद्यापीठ विधेयक संमत करताना त्यातून मागासवर्गीयांसाठी घटनेने मान्य केलेले आरक्षणच नाकारले. भारतीय राज्यघटना समतेवर आधारलेली आहे. घटनेनुसार नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मज्जाव आहे, पण प्रत्यक्षात राज्यकर्ते कधी राजकीय फायद्यासाठी, तर कधी गुणवत्तेच्या नावाखाली भेदभाव करून घटनेच्या समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.अशा प्रश्नावर देशातील तमाम सवलती घेणाऱ्या कामगार कर्मचारीवर्गाचे राष्टीय संघटना करून सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभे करून लढाऊ भूमिका न घेता काही संघटना 83वर्षाच्या पुणे कराराचा मुद्दा उपस्थित करून आपली शक्ती वाया घालवितात.आणि तमाम बहुजनांना मूर्ख बनवितात.पुणे कराराचा धिक्कार करण्या पेक्षा जे गांधी आंबेडकर यांना जमले नाही समजले नाही.ते आपण करून दाखवा.कोणते बहुजन आहेत?.त्याचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षणाची तयारी ठेवा आणि त्यांना एकत्र करा.

Thursday, September 24, 2015

भैय्यासाहेब स्मृतिदिना निमित्त आत्मचिंतन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत कोणताही कार्यकर्ता आपल्या घरादाराची परवा न करता झोकून देत असतो.आणि चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याची कधीच खंत नसते.कारण त्याच्या नसानसात त्या बाबासाहेबाचे वैचारिक विचार भरलेले असतात.दलित शोषित वंचित समाजाच्या न्याय हक्क साठी ज्या डॉ बाबासाहेबांनी आपल्या स्वताच्या कुटुंबातील बायको मुलाची परवा न करता रात्र दिन अभ्यास करून संघर्ष केला.बाबासाहेब नावाच्या ज्ञानसुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी १२ डिसेंबर १९१२ ला जन्मलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर.१७ सप्टेंबर १९७७ ला त्याचे निधन झाले  त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आत्मचिंतन  
आज देश भरातील कार्यकर्ते नेते.आपल्या मुलाना सर्व सुविधा असताना त्याचे योग्य पालन पोषण करू शकत नाही.मग तेव्हा सर्व आर्थिक परिस्थती बेताची असताना बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले भय्यासाहेब.परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे भय्यासाहेब.बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले भय्यासाहेब.बाबासाहेबांच्या महापरी निर्वाना नंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्या साठी झोकून देणारे भय्यासाहेब.आणि गटबाजी गावकी भावकीच्या स्पर्धेपासून लांब राहू पाहणारे भय्यासाहेब त्यामुळे सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले.त्यागाचा बळी ठरलेले.महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे.समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर.
भय्यासाहेब लहानपणा पासूनच न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले.त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " थॉट ऑफ पाकीस्थान " हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " फेडरेशन वेरसुस फ्रीडोम " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर ते वापर करीत असत. भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झालेच पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते . महाडच्या चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला .चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी मुंबई महानगरपालिका कडे ४० बाय ४० ची जागा मागितली मुंबई महानगरपालिका ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला .अखेर मुंबई महानगरपालिका सुधार समिती ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . मागसवर्गीय फेडरेशन आणि रिपाई पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही मोठ्या प्रमाणत दान देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत पायपीट करून समाजाला दान देण्याचे आवाहन करीत होते. १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले.या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ.बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७ मार्च १९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना.बापू जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले. बाबासाहेबांच्या महापरी निर्वाणा नंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला होता.भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधान परिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्या सोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ . स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले होते . जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली होती. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.त्याच प्रमाणे आजच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्याच्या कार्यकर्त्याच्या मुलामुलीचे नाही नाना प्रकारच्या तडजोडी करून मुलाचे लाड पुरविल्या जातात.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परि भाय्यासाहेबावाराची केलेली ही प्रतारना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रतारना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? भैय्यासाहेबांच्या स्मृती दिना निमित्य आपण पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.भैय्यासाहेबांच्या  स्मृतिदिना निमित्य त्यांना कोटी कोटी प्रणाम 

विषमतावादी शिक्षक दिन

विषमतावादी शिक्षक दिन
भा
रत हा विषमतावादी विचारांचे पारंपरिक रीतिरिवाज साजरे करणाऱ्या जातिवादी शिक्षण देणाऱ्याचे समर्थन करणारा देश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण  देशातील सर्व शिक्षण संस्था डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात.
   डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केल्या जातो. पण आता मानसिक गुलामगिरिच्या एक एक श्रृंखला तुटत आहेत गुलामगिरीची असंख्य प्रतिक आता लवकरच संपणार आहेत पण त्यासाठी गरज आहे वैचारिक प्रबोधनाची. देशातील बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता जोतीराव फुले आहेत हे ठाम पणे मांडणारे शिक्षक आणि विद्यार्थी तयार होणार नाहीत तो पर्यन्त शासकीय डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन साजरा होत राहील.
   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे.असे डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी लिहलेल्या चरित्र ग्रंथात सांगितले आहे (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते... जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरु केली होती. १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली होती म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केली म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते आणि आहेत. जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केली नाही. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुळेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली. शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले.शिक्षणा अभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे.याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा त्यांच्या तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता... तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या म्हणजे देशातील पाहिले शिक्षक हे राष्टपिता महात्मा जोतीराव फुलेच होते. डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केली नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही. बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास ब्राम्हण लोकांचा तिव्र विरोध होता.त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविणाऱ्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही.किंवा मुला मूली कडून कोणतीही फ्री घेतली नाही गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले.यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान दिले नाही.त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले या पाठीमागे त्यांची किती तळमळ होती हे लक्षात घ्या कारण त्यांना समाजसेवा करायची नव्हती तर समाज परिवर्तन करायचे होते.
    डॉ.राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी विनावेतन तर सोडाच पण वेतन घेउन देखिल शिकविले नाही.याउलट भरपूर पागार घेउन फक्त उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शिकविले. उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते मद्रास, हैद्राबाद, कलकत्ता, बनारस इ. विद्यापिठात गेले.पण एकाही खेड्यात जाउन बहुजनांच्या मुला-मुलींना शिकविले नाही.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षते खाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले होते.तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर ब्राम्हण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.गोर-गरीब, कष्टकारी, कामगार,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले.असे काम डॉ. राधाकृष्णन यांनी कधीच केले नाही.तरी शिक्षक दिनाचे हक्कदार कसे?.
   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली. डॉ. राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला. त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला होता. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान नाही काय?.जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तज्ञ होते.खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केली.त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा तात्याराव श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या होत्या.बहुजनांना शिक्षण मिळाल्या शिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव यांनी शाळा सुरु केल्या. डॉ.राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मिळकतिचा एक रुपया देखिल बहुजनांच्या शिक्षणांसाठी खर्च केला नाही. देशातील ज्वलंत समस्या निवारण्यासाठी जोतीरावनी सनातनी ब्राम्हण समाजा विरुद्ध निर्भयपणे लढा दिला.
  जोतीराव यांनी बालविवाह ला कडाडून विरोध केला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांचा विचार न करता ११ ते १६ वर्षी केली त्यांच्या मुलीने नवरय मुलाला साधे पाहिले देखिल नव्हते. म्हणजे संपूर्ण जगात तत्वज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या अमेरिका, इंग्लड, रशिया इ. राष्ट्रात प्रदीर्घ वास्तव केलेले असताना देखिल स्वतःच्या मुलींचे त्यांनी बालपणीच विवाह केले.विवाहा बाबत ते म्हणतात की लग्न ही स्वर्गात ठरवली जातात म्हणजे ते किती सनातनी प्रतिगामी विचारांचे होते यावरून दिसून येते.या उलट जोतीराव यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविला होता.आणि समाजात जनजागृती केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला आणि वाढविला. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे होते ते आज ही सर्व मानव जातीच्या कल्याणा करीता वापरता येते.डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी" या ग्रंथात डॉ. राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे क्रांतिबा जोतीराव फुले कुठे आणि हे डॉ राधाकृष्ण कुठे?.

डॉ राधाकृष्ण यांचा समाज त्यावेळी झोपला होता पण आज सर्वत्र जागा आहे.ज्या स्रियांना शिकण्यासाठी बंदी होती.त्याच समाजाच्या स्रिया आज शिक्षणात पुढे आहेत.त्याच्यावर जोतीराव आणि सावित्रीबाई जे उपकार केले आहेत ते या स्रिया विसरतात.हे फुले दांपत्य जर नसते तर ब्राम्हणाच्या स्रिया कुठे असत्या ?.या स्रियांना त्याच्या समाजातील पुरुष किती किंमत देतात यांना नाही.पण जोतीराव फुले यांनी सावित्रीबाई ना कधीही स्त्री म्हणून गौण लेखले नाही.याउलट त्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर केला त्यांच्यावर विश्वास ठेवला.जोतीराव यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारे मदत केली जोतीराव सावित्रीमाई यांना नेहमी अहो-काहो असे आदराने बोलत असत.डॉ राधाकृष्णन यांनी मात्र त्यांच्या पत्नी शिवकम्मू यांना स्वातंत्र दिले नाही त्यांना शिकविले नाही म्हनुनच त्यांचे व्यक्तिमत्व कोमेजुन गेले.स्त्री शिक्षणासाठी एकही कार्य राधाकृष्णन यांनी केलेले नाही.जोतीराव यांनी स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र व शिक्षण तर दिलच पण देशातील सर्व जातिधर्माच्या मुलींना शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी दिले,ती प्रचंड संघर्ष करून  म्हणून त्यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील विद्यार्थिनी कु.मुक्ता साळवे ही धर्माबाबत अप्रतिम निबंध लिहू शकली.जोतीराव यांच्या स्त्रिस्वातंत्र्याचे हे फल आहे तर डॉ. राधाकृष्णन यांचे मात्र स्त्रियांबाबताचे विचार हे खालच्या पातळीवरचे होते. स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता जास्त असते सेवावृत्ति हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ति आहे.असे म्हणण्या मागे मला नाही वाटत की त्यांना स्त्रियांबद्दल काही सहानभूति होती ते यामागे स्त्रियांना गुलाम ठेवणे हाच हेतु त्यांचा आहे. तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व स्वखर्चाने शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. याचा सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करा व निर्यय घ्या तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर  ?? (संदर्भ-  राधाकृष्ण अ बायोग्राफी - Page 10,)

पुणे करार धिक्कार करण्या पूर्वी

पुणे करार धिक्कार करण्या पूर्वी 
भारत देश स्वत्रंत झाला तेव्हा समतावादी लोकांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच होती.आणि विषमतावादी लोकांची व संघटनाची संख्या खूप मोठी होती.तेव्हा सातासमुद्रापार ब्रिटीश सरकार बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम मागसवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी वैचारिक संघर्ष करीत होते.त्यांनी जगातील विद्वानां समोर भारतातील बहुजन समाजाची सत्य परिस्थिती मांडली  होती.त्यामुळे त्याच्या संघर्षाला यश प्राप्त झाले होते.हा इतिहास वाचून कोणी बदलू पाहत होता.ज्याला हे ऐकणे व वाचणे अशक्य झाले होते.त्यांनी पुण्याच्या जेल मध्ये आमरण उपोषण सुरु केले.त्याचा शेवट २४ सप्टेंबर १९३२ ला पुणे येथे झाला.म्हणून त्याला पुणे करार असे म्हणतात.तो करार एम के गांधी आणि डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्यात झाला.त्याचा धिक्कार खुद बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.पण तडजोड करून.
  बामसेफ,मूलनिवासी,अम्बस,भारत मुक्ती मोर्चा सारख्या काही संघटना,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार आणि आंबेडकरी चळवळ दुषित करण्याचा जीवतोड मेहनत करीत आहे.पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी चळवळी तील लोकांमध्ये जात आहेत. इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर ते भारताला बहुजन समाजाला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेवढाच प्रकारे स्वताच्या स्वार्था साठी लढणाऱ्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे अनेक समाज आंबेडकरी चळवळी पासून दूर जात आहे .गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अनेक व्याख्यान,परिसंवाद,देशभर भाषण देणारे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष समाजाला कोणताही फायदा देऊ शकला नाही.असे चित्र निर्माण करून त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असे यांना पुणे कराराचा धिक्कार करून दाखवून दयाचे असते.पण त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता.
  २४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो.बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर एम के गांधीचा प्रखर विरोध होता त्यामुळे त्या विरोधात गांधीनी  आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती की अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी, मतदानाचे दोनवेळा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व उच्च वर्णीय वर्गीय समाजात प्रचंड चीड त्यावेळी निर्माण झाली होती. ती आज ही अहमदनगर जिल्ह्यातील घटना पाहून दिसते.मग आठवा तेव्हा काय परिस्थिती असेल.पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या कडे खैरलांजी खर्डा जवखेडा,सोनई या भीषण हत्याकांडा बाबत कोणती ही ठोस भूमिका नाही.
   गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार केवळ दोन व्यक्तिचा नव्हता तर समतावादी आणि विषमता वादी समाजातील होता. एकाबाजूला असंघटीत कष्टकरी हात मजुरी करणारा समाज तर दुसरीकडे या सर्व मागासवर्गीय समाजाचे शोषण करून आय्याशी पणे जगणारा समाज होता.त्यातील हा संघर्ष होता.
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता की, अस्पृश्यांना समतेचे सामाजिक व राजकीय हक्क त्यांचा एक निसर्गदत्त अधिकार म्हणून मिळाले पाहिजेत, तर महात्मा गांधी अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे भूतदयावादी दृष्टिकोनातून पाहत होते. बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा एक राजकीय हक्क म्हणूनच मिळाला पाहिजे, असे वाटत होते, तर महात्मा गांधी अस्पृश्यांना हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग मानीत होते. म्हणून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास त्यांनी प्राणांतिक विरोध केला. महात्मा गांधी हे स्वत:स तमाम अस्पृश्यांचे नेते म्हणवीत होते, तर बाबासाहेब गांधीजींचा हा दावा खोडून काढताना आपणच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहोत, हे ठासून सांगत होते.ब्रिटिश सत्तेने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यावर महात्मा गांधींनी येरवडा जेल मध्ये प्राणांतिक उपोषण करताना अशी भूमिका घेतली होती की,अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक अंग असल्यामुळे हिंदूंचे ऐक्य फुटणे आपणास मान्य नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मुस्लिम-शीख व ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे जर देशाचे व समाजाचे ऐक्य धोक्यात येत नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे ते कसे काय धोक्यात येऊ शकते? महात्मा गांधींनी तरीही आमरण उपोषण करून बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यायला भाग पाडले व तत्कालीन विधिमंडळात 148 राखीव जागा तसेच स्पृश्य हिंदूंच्या जागांपैकी मध्यवर्ती विधिमंडळातील 10 टक्के जागा अस्पृश्यांना देण्याचे मान्य करणारा पुणे करार केला. 
   25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या पुणे कराराचा एक राजकीय फायदा असा झाला की, राजकीय पक्षांचे लक्ष अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे वेधले गेले. महात्मा गांधी मंदिर प्रवेशाच्या बाजूचे झाले. शिवाय पुणे करारामुळेच आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत यावर शिक्कामोर्तब झाले होते. बाबासाहेब आंबेडकर पुणे करारावर भाष्य करताना म्हणाले, ‘महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेतच अस्पृश्यांच्या राखीव जागांना मान्यता दिली असती तर गांधीजींवर उपोषणाची पाळी आली नसती.’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘पुणे करार हा अतिपवित्र असा करार मानून तो अस्पृश्य बंधूंनी सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे पाळावा.’ पुणे कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अशी असताना बामसेफ सारख्या काही संघटना पुणे कराराची नादानपणे धिक्कार करीत असतात. धिक्कार करणारांना एवढेही भान राहत नाही की, पुणे करार एकट्या महात्मा गांधींचा नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्या करारावर महात्मा गांधीं बरोबरच बाबासाहेबांचीही स्वाक्षरी आहे. तेव्हा आपण पुणे कराराचा धिक्कार करीत असताना कळत-नकळत बाबासाहेबांना कमी लेखून त्याचा हि धिक्कार करीत नाही ना ?.
  गांधी-आंबेडकर यांच्यात अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर तीव्र संघर्ष झाला हे खरे, पण म्हणून गांधी-आंबेडकर संघर्ष हिंदुत्ववादी संघ परिवारासारखा विखारी नव्हता. बाबासाहेबांनी महात्मा गांधींवर कठोर टीका केली, पण या टीकेचे स्वरूप दृष्टिकोनाची, विचारांची मतभिन्नता असी होती. बाबासाहेबांनी महात्मा गांधींबरोबर पुणे करार करायला नको होता असे आजही ज्यांना वाटते व आततायीपणे जे महाभाग पुणे कराराची होळी करून धिक्कार करतात त्यांनी हेही समजून घेतले पाहिजे की, वाटाघाटीत देवाण घेवाण करावी लागते. महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध जेव्हा प्राणांतिक उपोषणची सुरुवात केली होती तेव्हा देशात स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यांच्यावर अत्यंत प्रक्षोभक आणि विखारी भाषेत टीका होऊ लागली होती. ‘त्या’ उपोषणात समजा, महात्मा गांधींच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर दलित समाजाचे काय झाले असते?. याचा कसलाही सारासार विचार न करता पुणे कराराच्या 83 वर्षांनंतरही आज काही अतिहुशार लोक या करारास विरोध करीत असतील तर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजला नाही असे माझे स्पष्ट मत आहे

  भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्यांचा काहीही दोष नव्हता अशा शिखांचे भीषण हत्याकांड झाली.तसेच नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यावर काही ब्राह्मणांचीही घरे जाळली गेली. महात्मा गांधींशी पुणे करार न करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करून तसेच संकट बाबासाहेबांनी आपल्या समाजावर ओढवून घ्यायला पाहिजे होते काय ?.
  पुणे कराराने सांसदीय संस्थांतील राखीव जागांचे तत्त्व मान्य केले. परिणामी बाबासाहेबांनी घटनेत मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक सोयींची तरतूद करतानाच नोकरयाचे ही आरक्षण मिळवून घेतले, पण आजची खरी अडचण अशी आहे की, सरकार मागासवर्गीयांचा सरकारी सेवेतील अनुशेष भरण्याची टाळाटाळ करते. त्यांची पदोन्नती रोखून धरते. कहर म्हणजे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच खासगी विद्यापीठ विधेयक संमत करताना त्यातून मागासवर्गीयांसाठी घटनेने मान्य केलेले आरक्षणच नाकारले. भारतीय राज्यघटना समतेवर आधारलेली आहे. घटनेनुसार नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मज्जाव आहे, पण प्रत्यक्षात राज्यकर्ते कधी राजकीय फायद्यासाठी, तर कधी गुणवत्तेच्या नावाखाली भेदभाव करून घटनेच्या समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.अशा प्रश्नावर देशातील तमाम सवलती घेणाऱ्या कामगार कर्मचारीवर्गाचे राष्टीय संघटना करून सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभे करून लढाऊ भूमिका न घेता काही संघटना 83वर्षाच्या पुणे कराराचा मुद्दा उपस्थित करून आपली शक्ती वाया घालवितात.आणि तमाम बहुजनांना मूर्ख बनवितात.पुणे कराराचा धिक्कार करण्या पेक्षा जे गांधी आंबेडकर यांना जमले नाही समजले नाही.ते आपण करून दाखवा.कोणते बहुजन आहेत?.त्याचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षणाची तयारी ठेवा आणि त्यांना एकत्र करा.