Saturday, July 11, 2015

रमाबाई हत्याकांडाचे काय झाले?.

रमाबाई हत्याकांडाचे काय झाले?. 

महाराष्ट्र सध्या अहमदनगर जिल्हात दलित बौद्धा अन्याय अत्याचार च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढल्यामुळे गाजतोय अहमदनगर जिल्ह्यात ज्या दलित बौद्ध तरुणाच्या हत्या झाल्या त्याबाबत जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना पक्ष सोडल्यास कोणाला ही वाईट वाटले नाही.पण प्रचंड आक्रोश मोर्चा काढल्यामुळे त्याच्यातील सैतान माणूस जागी झाला ?.नेमके सध्या महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेवर आहे.ज्या रमाबाई नगरातल्या हत्याकांडा नंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं होत आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला. पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने ही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली होती .हे विसरता येत नाही. मनोहर कदम साररखा जातीवादी अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, मनोहर कदम याच्यामुळे रमाबाई नगरात झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपका ही आयोगाने ठेवला होता. असं असतानाही राज्य सरकारने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबना साठी गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता. 
   ११ जुलै 1997 ला जातीवादी हरामखोर राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण शहीद झाले होते तर 23 जण जखमी झाले होते.आज (११ जुलै) रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात रमाबाई नगर हत्त्याकांडात भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील मोठ्या अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय होता. स्वतंत्र भारतात वावरणाऱ्या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समाजावरचा  द्वेष जगासमोर आणणारी ही घटना होती. या हत्त्याकांडत अनेक भीमसैनिकांना, माया बहिणींना,आबाल वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी हा काळा दिवस आहे.
   रामबाई हत्याकांडा नंतर अनेक जनांदोलन झाली .नामांतर साठी १६ वर्ष संघर्ष झाला.खैरलांजी ते,जवखेडा,खर्डा,सोनई,शिर्डी अहमदनगर जिल्हा राज्यातील दलित बौद्ध समाजा करिता जातीवादी मानसिकता असलेल्या सैताना चा उगमस्थान झाला आहे.रमाबाई हत्याकांडा पासून शिर्डीच्या हत्याकांडा पर्यंत सर्व आंबेडकरी संघटना राज्यात तालुखा जिल्ह्यात आपसातील मतभेद विसरून जनांदोलन करताना पोलीस स्टेशन वर सनद शीर मार्गाने नोंद करतात.पण न्यायलाया कडून न्याय मिले पर्यंत सर्व पुरावे नष्ट केल्या जातात.आणि मुख्य आरोपी पुराव्या अभावी सही सलामत सुटतात.मग आमची तरुण मुले विचारतात बाबा रमाबाई नगरातील हत्याकांडाचे काय झाले?.
      रमाबाई हत्याकांडा करिता ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.तेच मुख्य आरोपी झाले.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली तो आणि त्याचा मुख्य सूत्रधार कधीच समोर आला नाही.जनआंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नेते नंतर स्वताला पोलीस कोर्टाचे चक्कर काटून हैराण झाले आणि कांग्रेसवासी  झाले. त्यामुळे ते ना आंबेडकरी समाजाचे राहिले ना रिपाईचे. आज रमाबाई नगर घाटकोपर चा फेर फटका मारल्यास हेच का ते रमाबाई नगर असा प्रश्न पडतो .रमाबाई नगरातील ४५ मंडळा च्या तरुण कार्यकर्त्यांना भेटा आणि एकच प्रश्न विचारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि गोळीबार करणाऱ्या मनोहर कदमचे काय झाले?.रामबाई नगरातील गोळीबारत निरपराध भिमसैनिक मारल्या गेले.त्या शहीदाना विनम्र अभिवादन करण्या शिवाय आपल्याला पर्याय नाही.कारण ज्यांनी रमाबाई हत्याकांड ज्यांच्या आशीर्वादाने मनोहर कदम यांने घडविले त्याचेच सरकार आज आहे.आणि दुखची बाब हि कि ज्या नेत्याने समाजा कडून कृत्र्या सारखा मार खल्ला तेच मान्यताप्राप्त नेता आज त्याच्या मांडीला मांडी लावून शिर्डीच्या आक्रोश मोर्च्याचा निषेध करून शिवसेना तालुखा प्रमुख कमलाकर कोतेची हिंमत वाढवतो.त्यामुळे एक मनोहर कदम जरी जेरबंद झाला तरी हजारो मनोहर कदमचे आत्मे प्रमोद वाघाच्या रुपात समोर येत राहतील.रमाबाई ते शिर्डी हत्याकाड घडविणारी प्रवृत्ती गाडण्यासाठी बंद करा ती गटबाजी सर्वांनी एक व्हा भीमाचे लेक व्हा आणि शहीदा ना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्हा.

Wednesday, July 8, 2015

९ जुले दलित पंथरचा स्थापना दिवस

९ जुले दलित पंथरचा स्थापना दिवस 


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण च्या नंतर दलित चळवळीचे नेतृत्व समर्थ हीन झाले.लाचार होऊन गटबाजीत अडकले तेव्हा त्यांना समर्थ पणे तोंड देणारी आणि गोरगरिबांच्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारी जी तरुण तडपदार जहाल युवक चळवळ उभी राहली. दलितांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे दलित पँथर. अमेरिकेतील निग्रो कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॉक पँथर या संघटनेचा प्रभाव दलित पँथरवर होता. १९६६ साली ह्यू.पी.न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पँथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलँड येथे केली होती. दरम्यानच्या काळात त्यावर अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून येत असत. सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे ब्लॅक पँथर या संघटने विषयी उत्सुकतेपोटी चर्चा होत असे. वास्तविक अशा प्रकारच्या संघटनेने आपल नेतृत्व करावे यासाठी त्यांनी प्रयत्‍न सुरू केले.
    महाराष्ट्रात १९७० च्या आसपास दलित मागासवर्गीय जातींवरील अन्याय अत्याचारांनी कळस गाठला होता.या सगळ्याचा परिपाक म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली आणि पँथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई ) येथे ९ जुलै १९७२ रोजी भरली. बैठकीत स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार आणि रिपाई नेतृत्व अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले. १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पँथरमधे प्रवेश केला.प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे विचारपीठ वाटत होती.    रिपब्लिकन नेतृत्व हे उच्च जात वर्गीयाचे दलाल झाले होते.तेच आंबेडकरी चळवळी चे मारेकरी ठरले कारण रिपाईचा प्रत्येक गट म्हणजे सत्ता धारयांनी निर्माण केलेले संस्थान आणि त्याचा नेता म्हणजे संस्थानिक होते आज भी आहेत.त्याच मुळे आंबेडकरी चळवळ कायमची गटबाजीत विभागल्या गेली.तिला कायम आमदारकी खासदारकी चे गजर दाखवीत झुंजवत ठेवण्याचे कसब सत्ताधारी धनदांडगे, जातदांडगे यांनी दाखविले आहे.
     १९५७ ते १९७० च्या साचेबद्ध दलाल,धोकेबाज प्रवृत्ती विरुद्ध दलित पंथर नांवाची वीज कोसळली होती.तिने सम्रग व्यवस्था बदलून टाकण्याची घोषणा केली होती आणि जगातील सर्व क्रांतिकारी लढयाशी आपले ऐतिहासिक नाते सांगितले होते विशेषता अमेरिकेतील निग्रो कृष्णवर्णीयाची क्रांतिकारी संघटना ब्लॉक पंथर चे आदर्श उराशी बाळगले होते.आणि आपले शत्रू व मित्र यातील नाते स्पष्ट केले.आणि फुले,शाहू,आंबेडकरी विचारांवर आधारित एक क्रांतिकारक कार्यकम दलित पंथर च्या तरुण कार्यकर्त्यांनी दिला होता.या उठावाने सत्तेवर हल्ला बोल केल्याने सत्ताधीश आणि त्याचे संस्थानिक दलाल दलित नेतृत्व आरपार हादरून गेले होते.परंतु सांस्कृतिक पातळीवर लढाऊ भूमिका मांडणारया दलित पंथरला उच्चजातवर्गीय शासन यंत्रणेने प्रचंड दमन करून खतम केले.
   कल करो सो आज, आज करो तो अभी, अशी भूमिका घेणारे सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणार्‍या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले जात होते.त्यामुळे शहरातील सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा तरुण खेड्या पाड्यातील अन्याय अत्याचार पाहून पेटून उटत होता..त्या अन्याय,अत्याचारला वाचा फोडण्यासाठी पुढेया आणि नेतृत्व करा असे कधीच कुणाला सांगण्याची गरज पडली नाही.स्वताहून तरुण स्थानिक पोलीस आणि प्रशासनाशी लढत होते.यामुळेच दलित पंथर चा इतिहास झाला.
पँथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हटले होते.दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला सार्‍या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वहानातून सणसणत अस्तित्वात येतील -दलित पँथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप म्हणून लोकांच्या पुढे आले होते.ज्यांनी हे मांडल ते त्यावेळी खूप प्रामाणिक होते.जेव्हा त्याच्या मुख्य उधिष्टा पासून दलित पंथर ची तरुण नेते मंडळी भटकली आणि दिशा हीन झाली.त्यांचे जिवंत पाणी थडग बांधल्या गेले.
    आज महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळी तील लोकांना वाटते दलित पंथर सारखी संघटना हवी.पण आज जी काही नेते मंडळी आहे ही सर्व दलित पंथर च्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा केलेले नेते आहेत. तडजोडी च्या राजकारणामुळे त्याकाळची रिपाई लाचार झाली होती.त्या पेक्षा जास्त सवाई बनेल नेतृत्व आज तालुखा,जिल्हा राज्यात निर्माण झाले आहे.आजची सर्व नेते मंडळी अन्याय,अत्याचार झाल्यावरच कामाला लागते, अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिलेला सनदशीर मुलभूत अधिकार त्यातून दलित मागासवर्गीय समाजाचा सर्वगिन विकास आणि कल्याण झाले पाहिजे.त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे कायदे,योजना याची माहिती आजचे कार्यकते आणि नेते घेत नाही.दलित पंथर नी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली भूमिका सर्वच विसळले आहेत. दलित पंथर सारखी संघटना हवी असेल तर त्याचा जाहीरनामा स्वीकारला पाहिजे दलित पंथर चळवळीत जे जे शहीद झाले त्यां सर्वाना दलित पंथर स्थापना दिना निमित्य विनम्र अभिवादन!.