Tuesday, May 19, 2015

पोलिसातील माणुसकी जागवा

     पोलिसातील माणुसकी जागवा 
वाकोला पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकाने वरिष्ट पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालुन हत्या केल्यामुळे पोलिसातील अंतर्गत असलेला वाद चवाटयावर आला.त्या ला आता विविध कांगोरे फूटत आहेत.कोणी म्हणते अतिरिक्त दिवटीच्या आणि सुट्या मुळे पोलिस नेहमी तणाव खाली असतात. हे पूर्ण सत्य नाही पोलिस दिवटीवर असताना कधीच  तणाव खाली नसतात. त्यांना आळी पाळी ने आराम करण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असते. पोलिसांच्या गाडया ज्या जागी उभ्या असतात.त्यात तत्पुरती व्यवस्था असते.पोलिसांच्या गाडया बिना उत्पन्न असल्या शिवाय त्याजागी उभ्या राहत नाही.त्यात त्याचे दोन फायदे असतात त्या ठिकाणी उभे राहून ते एका पार्टीचे रक्षण करतात तर दुसऱ्या पार्टीची लूट.पोलिसांना दोनी कडून हप्ते मिळतात.ते पाहण्यास तुम्हाला कर्णाक बंदर ते शिवडी बीपीटी रोड वर आणि मुंबई च्या अनेक चौकात जावे लागेल.पोलिसाची गाडी उभी असताना ठराविक ठिकाणी मालवाहतुक करणाऱ्या गाड्या तुन माल लुटल्या जातो.मालवाहतुक करणाऱ्या चालकानी पोलिसात तक्रार केल्यास पोलिस त्यालाच दम देतात तुमच्या मालाची काळजी तुम्ही घ्यावी त्या साठी आमची दिवटी नाही.मग पोलिस गाडी चौकात उभी कसा साठी असते. 
    मुंबई तील रेल्वे स्टेशन जवळचे रोड पहा.फेरीवाले बेस्ट, रिक्षा फिरण्यास जागा ठेवत नाही. त्यांची तक्रार पोलिसा कडे केल्यास ते म्हणतात ते आमचे काम नाही. जास्त वाद घेतल्यास गाडीत बसा चला पोलिस स्टेशनला लेखी तक्रार करा. मग सुरु होते तुम्ही कोण ? कुठे काम करता?. कुठे रहता ?. कोणत्या पक्षा चे काम करता ?. तुम्हालाच काय त्रास होतो?. हजारो लोक जातात,येतात दिसते ना तुम्हाला ?. असा अनुभव पोलीसा कडून नेहमीच येतो. असे का होते?. पोलिस हा जनतेच्या रक्षणा करीता असतो?. जनतेची सेवा करतो ?. मग ते असे का वागतात.का त्याच्यातील माणूस जागा होत नाही.कारण....?
   पोलिस भर्ती होतानाच त्यांना शारीरिक बौद्धिक गुणवंते बरोबर वशिला आणि पैसा लागतो. पहिल्या दिवसा पासुन जनतेची सेवा करण्या करीता सर्व रोड वर धंदा करणाऱ्याची यादी,सर्व प्रकारची धंदा करणाऱ्याची यादी, समाज सेवक,राजकीय कार्यकर्ते,नेते, एजेंट, दलाल यांची यादी, प्रसिद्ध गुन्हेगार यांची माहिती त्यांच्या पासुन कसे सावध राहवे यांचे घटना बाह्य नियम यांचे प्रशिक्षण पोलिसांना असते. यातून कोण्या अधिकार्याला किती वाटा जातो, मिळतो.यांची डायरी प्रत्येका कडे असते.
    पोलिस कोणाशी प्रेमाने वागतात?.त्यांचे त्याच्या पोलिस असलेल्या माणसा बरोबर  का जमत नाही त्यांचे या मागे हा इतिहास आहे.प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये एका देवाधिकाचे मंदिर हे असतेच पोलिस हे भारतीय राज्यघटने च्या नुसार धर्मनिरपेक्ष, निपक्ष,निर्भीड पणे काम करणारी सर्वत महत्वाची यंत्रणा आहे.तीच संविधानतील कायदा कलमा पेक्षा धर्म आणि जातीच्या अलिखित कलमा नुसार आचरण करीत असेल तर प्रत्येक पोलीसा ची जात महत्वाची ठरते.जोशी विरोधी शिर्के, शिर्के विरोधी कांबले असे एक नाही हजारो उदहारण पोलिस दलात आहेत.पोलिस हा प्रथम धर्मनिरपेक्ष असला पाहिजे तरच त्यातील माणूस जागा होईल. पोलिसातील माणूस जागा झाला तर त्याच्या विभागातील घटना बाह्य अनेक धंदे बंद होतील. त्याचा फायदा सर्वच समाजाला होऊ शकतो.पोलिसातील माणूस जागा झाला तर देशातील भष्ट्राचार नख्खीच कमी होईल.मानवा तील माणूस जागा झाला.पोलिसातील ही माणूस ही जागा होईल 

No comments:

Post a Comment